पहिली पंचवार्षिक योजना

पहिली पंचवार्षिक योजना

पहिली पंचवार्षिक योजना

पहिल्या पंचवार्षिक योजनेची महत्वाची वैशिष्ट्ये –

कालावधी – १ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६. पंडित नेहरूंनी पहिली योजना मांडली.

अध्यक्ष पं. जवाहरलाल नेहरू

उपाध्यक्ष – गुलझारीलाल नंदा

प्रतिमान – हेराल्ड डोमर यांचे जास्त गुंतवणुकीचे प्रतिमान

मुख्य भर – कृषी क्षेत्र

उद्दिष्टे – दुसरे महायुद्ध व देशाची फाळणी यातून सावरणे, भाववाढ नियंत्रित करणे, सामाजिक न्यायासाठी प्रयत्न करणे.

दुसरे नाव – पुनरुत्थान योजना

प्रकल्प –

  • दामोदर खोरे विकास योजना (झारखंड – पश्चिम बंगाल )
  • भाक्रा- नानगल प्रकल्प (सतलज नदी, हिमाचल प्रदेश – पंजाब)
  • कोसी प्रकल्प (कोसी नदी, बिहार)
  • हिराकुड योजना (महानदी, ओडिशा)
  • हे चारही प्रकल्प अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पावर आधारित, बहुउद्देशीय प्रकल्प होते.

कारखाने –

  • खत कारखाना – सिंद्री, झारखंड
  • रेल्वे इंजीन कारखाना (चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स) – चित्तरंजन, पश्चिम बंगाल
  • रेल्वे डब्यांचा कारखाना (पेराम्बुर लोको वर्क्स) – पेराम्बुर ,तामिळनाडू
  • हिंदुस्तान antibiotics – पिंपरी, महाराष्ट्र (WHO आणि UNICEF च्या मदतीने)

विशेष घटनाक्रम –

  • सप्टेंबर १९५१ – पहिल्या IIT ला मान्यता देण्यात आली (खरगपूर, पश्चिम बंगाल).
  • ८ मे , १९५२ – औद्योगिक विकास व नियमन अधिनियम, १९५१ लागू
  • २ ऑक्टोबर १९५२ – समुदाय विकास कार्यक्रम सुरु
  • १९५२ – भारतीय हातमाग बोर्ड स्थापन
  • १९५३ – समुदाय विकास कार्यक्रमाच्या चांगल्या अंमलबजावणीच्या उद्देशाने राष्ट्रीय विकास योजना (NES) सुरु .
  • १९५३ – अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्ड स्थापन
  • २८ डिसेंबर १९५३ – १९४५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या University Grants Committee चे University Grants Commission मध्ये रुपांतर करण्यात आले. पुढे १९५६ मध्ये UGC ला वैधानिक दर्जा मिळाला.
  • १ जुलै १९५५ – Imperial Bank चे रुपांतर SBI मध्ये केले
  • ५ जानेवारी, १९५५ – भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (ICICI) स्थापन

योजना यशस्वी होण्याची कारणे

  • योजना कालावधीत मान्सून अनुकूल होता
  • योजनेची लक्ष्ये कमी होती

आर्थिक वाढीचा दर

  • संकल्पित दर – २.१ %
  • साध्य दर – ३.६ %
  • योजना कालावधीत राष्ट्रीय उत्पन्न १८ % , दादोई उत्पन्न ११ % नी वाढले
  • किंमतीचा निर्देशांक १३ % नी कमी झाला – आजपर्यंतची एकमेव योजना ज्यात किंमतीचा निर्देशांक कमी झाला.
  • अधिक अन्नधान्य उत्पादन व संथ औद्योगिक वाढ साधली गेली.

योजना कालावधीतील राजकीय घडामोडी –

  • १९५१-५२ मध्ये स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुका पार पडल्या . सुकुमार सेन हे पहिले निवडणूक आयुक्त होते. कॉंग्रेस ला बहुमत मिळून पं. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले.
  • १ ऑक्टोबर १९५३ ला आंध्र प्रदेश या पहिल्या भाषिक तत्वावर आधारित राज्याची निर्मिती झाली.
  • १९५३ मध्ये फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला गेला. पं. हृदयनाथ कुंझरू व के. एम. पण्णीकर हे सदस्य होते. ३० सप्टेंबर १९५० ला अहवाल सादर झाला.
  • अमेरिका Public Law – 480 कायद्यांतर्गत इतर देशांना धान्य पुरवठा करते. १९५६ मध्ये भारताने हा करार केला व गहू आयात केला. या गव्हात गजर गवताचे बी आल्याने भारतभर त्याचा प्रसार झाला.

दुसरी पंचवार्षिक योजना वाचा.

अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

About Prithviraj Gaikwad

Check Also

पहिली पंचवार्षिक योजना

पहिली पंचवार्षिक योजना फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा …

Economics Notes PDF Download

Economics Notes PDF Download Economics Notes PDF Download

सातवी पंचवार्षिक योजना

सातवी पंचवार्षिक योजना सातवी पंचवार्षिक योजना सातव्या पंचवार्षिक योजनेची महत्वाची वैशिष्टये – कालावधी – १ …

Contact Us / Leave a Reply