भूगोल :

भूगोल Notes PDF Download

भूगोल Notes

सूर्य मंदिर – ओडिशा [1984] 6. महाबलिपुरम् का स्मारक समूह -तमिलनाडू [1984]

7. काजीरंगा राष्ट्रीय उद्यान – असोम [1985]

8. मानस वन्य जीव अभयारण्य – असोम [1985]

9. केवला देव राष्ट्रीय उद्यान – राजस्थान [1985]

10. पुराने गोवा के चर्च व मठ – गोवा [1986]

11. मुगल सिटी, फतेहपुर सिकरी – उत्तर प्रदेश [1986]

12. हम्पी स्मारक समूह – कर्नाटक [1986]

13. खजुराहो मंदिर – मध्यप्रदेश [1986]

14. एलीफेंटा की गुफाएं – महाराष्ट्र [1987]

15. पट्टदकल स्मारक समूह – कर्नाटक [1987]

16. सुंदरवन राष्ट्रीय उद्यान – प. बंगाल [1987]

17. वृहदेश्वर मंदिर तंजावुर – तमिलनाडू [1987]

18. नंदा देवी राष्ट्रीय उद्यान – उत्तराखंड [1988]

19. सांची का बौद्ध स्मारक – मध्यप्रदेश [1989]

21. हुमायूँ का मकबरा – दिल्ली [1993]

22. दार्जिलिंग हिमालयन रेल – पश्चिम बंगाल [1999]

23. महाबोधी मंदिर, गया – बिहार [2002]

24. भीमबेटका की गुफाएँ – मध्य प्रदेश [2003]

25. गंगई कोड़ा चोलपुरम् मन्दिर – तमिलनाडु [2004]

26. एरावतेश्वर मन्दिर – तमिलनाडु [2004]

27. छत्रपति शिवाजी टर्मिनल – महाराष्ट्र [2004]

28. नीलगिरि माउंटेन रेलवे – तमिलनाडु [2005]

29. फूलों की घाटी राष्ट्रीय उद्यान – उत्तराखंड [2005]

30. दिल्ली का लाल किला – दिल्ली [2007]

31. कालका शिमला रेलवे -हिमाचल प्रदेश [2008]

32. सिमलीपाल अभ्यारण्य – ओडिशा [2009]

33. नोकरेक अभ्यारण्य – मेघालय [2009]

34. भितरकनिका उद्यान – ओडिशा [2010]

35. जयपुर का जंतर-मन्तर – राजस्थान [2010]

36. पश्चिम घाट [2012]

37. आमेर का किला – राजस्थान [2013]

38. रणथंभोर किला – राजस्थान [2013]

39. कुंभलगढ़ किला – राजस्थान [2013]

40. सोनार किला – राजस्थान [2013]

41. चित्तौड़गढ़ किला – राजस्थान [2013]

42. गागरोन किला – राजस्थान [2013]

43. रानी का वाव – गुजरात [2014]

44. ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान – हिमाचल प्रदेश [2014]

Join us @Geomcq

🔹ड्रमलिन हिमनदांच्या संचयन कार्याने तयार झालेले टेकडीसारखे भूस्वरूप. याचा आकार चहाच्या उपड्या चमच्यासारखा लांबटगोल एका बाजूला निमुळता असतो. ड्रमलिन हिमनदांनी वाहून आणलेल्या रेताड गाळाने निर्माण झालेल्या असतात व त्यांचा मोठा आस हिमनदांच्या वाहण्याच्या दिशेत असतो. त्यांचा उतार सुरुवातीच्या बाजूला काहीसा तीव्र असून दुसऱ्या बाजूला मंद असतो. त्या प्रथम रुंद व नंतर हळूहळू निमुळत्या होत जातात. या सामान्यपणे अंत्य–हिमोढाच्या पाठीमागे आढळतात. ज्या वेळी पर्वतीय भागातील हिमनद मैदानात उतरल्यामुळे पसरतो, त्या वेळी त्यातील हिमसंचयाची जाडी कमी होते व त्यामुळे हिमनदाची वाहकशक्ती कमी होते. हिमनदाच्या तळाशी असलेला गाळ व जमीन यांमधील घर्षणामुळे गाळ साचण्यास सुरुवात होते. संचयित द्रव्याच्या किंवा एखाद्या क्षुल्लकशा अडथळ्यामुळे त्यावर गाळाची पुटावर पुटे गिलाव्याप्रमाणे साचतात आणि ड्रमलिन निर्माण होतात. लहानात लहान ड्रमलिन लहानशा ढिगाएवढ्या असून मोठ्यात मोठ्या ड्रमलिनांची लांबी २ किमी. अगर जास्त आणि उंची १०० मी. इतकी असू शकते. ड्रमलिनांच्या रांगा एकमेकींना समांतर असतात. उत्तर आयर्लंड, स्कॉटलंडमधील मिडलँडचा भाग, इंग्लंडचा उत्तर भाग, दक्षिण जर्मनी, स्वित्झर्लंड इ. यूरोपीय देशांत ड्रमलिन आढळतात. उत्तर अमेरिकेत त्या पंचमहासरोवरांच्या आसपासच्या भागांत आढळतात. काही ड्रमलिनांचा गाभा खडकांचा असून संचयित द्रव्याचा थर पातळ असतो. त्यांना भ्रामक ड्रमलिन म्हणतात. अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCGeography

🔹दख्खन पठार ‘दक्षिण’ या संस्कृत शब्दाचा ‘दख्खन’ हा अपभ्रंश असून, दक्षिण म्हणजे उजव्या हाताकडील अथवा दक्षिण दिशेकडील. यावरूनच दख्खन पठार अशी संज्ञा पडली असावी. या पठाराचा उल्लेख रामायण, महाभारत व मार्कंडेय, मत्स्य, वायु या पुराणांत अनेक वेळा आढळतो. पहिल्या शतकात एका ग्रीक मार्गनिर्देशकाने लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात या पठाराचा ‘दचिन बदेस’, तर पाचव्या शतकात आलेला चिनी प्रवासी फाहियान याच्या वृत्तांतात Ta–Thsin असा उल्लेख आढळतो. तसेच अभिजात संस्कृत साहित्यात व कोरीव लेखांत याचा ‘दक्षिण पथ’ असा उल्लेख आढळतो. सातवाहन राजांच्या कारकीर्दीत सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यास ‘दक्षिणापथपति’ अशी उपाधी दिलेली होती. दक्षिण पथावर सातवाहन, चोल, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव व होयसळ इ. वंशांचे राज्य होते. तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या पठाराविषयी फार थोडी माहिती उपलब्ध होती. तथापि पठारावर इतिहासपूर्व काळापासून मानवी वस्ती आहे, याबद्दल पुष्कळ पुरावा मिळतो. या पठाराच्या सीमेबाबत एकमत नाही. संकुचित अर्थाने उत्तरेकडे सातमाळा टेकड्या व दक्षिणेकडे कृष्णा नदी यांच्यामधील मराठी भाषा बोलली जाणाऱ्या (महाराष्ट्र) प्रदेशासच दख्खन पठार म्हणतात; तर व्यापक अर्थाने नर्मदा किंवा विंध्य पर्वताच्या दक्षि 0:300:30ाई *🏈उत्तरांचल-* भुतिया *🏈केरळ-* मोपला, उरली *🏈छत्तीसगड-* कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब *🏈नागालँड-* नागा, खासी, गारो, आओ, अंगामी *🏈आंध्र प्रदेश*- कोळम, चेंचू *🏈पश्चिम बंगाल* -संथाल, ओरान *🏈महाराष्ट्र-* भिल्ल, गोंड, वारली *🏈मेघालय-* गारो, खासी, जैतिया *🏈सिक्कीम* -लेपचा *🏈तामिळनाडू-* तोडा, कोट, बदगा जॉईन करा t.me/MPSCGeography 1] प्रदेश व त्यात अाढळणार्‍या वनस्पती याबाबत योग्य ज्योड्या लावा 1 टुंङ्रा 1]फर पाईन स्पुृस 2 तैगा 2] शेवाळ दगफुल 3] गवताळ 3] महोगनी शिसव 4] विषववृत्तीय 4] मँपल वाँलनट एल्म पयाॉय a b c d 1) 4) 3) 2) 1) 2) 2) 1) 4) 3) 3) 4) 1) 3) 2) 4) 1) 2) 3) 4) Ans2 2) खालीलपँकी चुकीचे नसलेले वीधान ओळखा 1] अाशियाच्या उत्तर दक्षिण व पूर्व भागात कोळशाचे साठे आहेत 2] नंसगिॅक वायु व खनिज तेल मुख्यत्वे नैञृत्यअाशियात आढळते. 3] यूरेनियमपासून अणूऊजाॅ मिळवली जाते . पयाॅय a) 1 2 बरोबर 3 चुक b) 2, 3. बरोबर 1 चुक c) कोणतेही नाही d) 1 ‘3 बरोबर 2 चुक Ans👉🏼c Que👉🏼 3) पृथ्वी —चंद्र हे अंतर ———प्रकाश सेंकद अाहें 1] 8.३ प्रकाश मिनीटे 2] 1. 28 प्रकाश सेंकद 3] 8.३ प्रकाश सेंकद 4 ] 2.28 प्रकाश सेंकद Ans👉🏼2 Que👉🏼 4 ] 1949 साली ———— या शास्ञज्ञाने ——— देशातील विरु खोर्‍यात उत्खनन करताना सवैक्षनाचे तंत्र विकसीत केले . 1] गार्ङन चीली , ब्राझील 2] सिनबास, अमेरिका 3] पिन्सेप ईग्लंङ ४] गार्ङनविली पेरु Ans👉🏼 4 Que👉🏼 5) भारताचे राष्टीय अभिलेखागार येथे अाहे . 1] मुंबई 2) चेन्नई 3] दिल्ली 4] नागपुर Ans👉🏼3 Que 6 👉🏼 जोहांस गुटेनबर्ग यांचा जन्म इ .स ———— मध्ये ——— येथे झाला. 1] 1398 , मेंझ 2] 1365 , गुटेनबर्ग 3] 1399 ,न्युयार्क ४] 1312 , जपान Ans👉🏼 1 Que 7) इतिहास म्हणजे भुतकाळ व वर्तमानकाळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद होय, असे विधान कोणी केले. 1) क्रोसे 2] ई . एच कार 3] टाँलेमी ४] प्लीनी. Ans👉🏼2 Que👉🏼 8) स्वांतत्र्यपुर्व काळात साधना हे खालील भाषेतील नियतकालीके प्रसिध्द होते. 1] संस्कृत 2] बंगाली 3] हिन्दी 4] मराठी Ans👉🏼2 #कृषिघटक 🔹सेंद्रिय खतांचे प्रकार… वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिक खाण्याचे खत, हाडांछे खत, तेलबियांची पेंड इत्यादी. १) शेणखत : शेण, मुत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकापासून तयार होणा-या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फूरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग म्हण्जे बायोगँसमध्ये उर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव  य म्हणुन वापरले जाते. २) कंपोस्ट खत :- शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थाचे सुक्ष्मजीवजंतु मुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते. ३) हिरवळीची खते :- लवकर वाढणा-या पीकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करुन पीक फुलो-यावर येण्याच्या आधी ते नागराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात त्यापासून जमीनीला नत्र मिळते. जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात. गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो.  ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीरीसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो.मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होते. ४) गांडूळ खत – ह्या खतात गांडूळाची विष्ठा, नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ, गांडूळाची अंडीपूंज, बाल्यावस्था आणी अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात. ५) माशाचे खत – समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ज्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते याला माशाचे खत म्हणूनही म्हंटले जाते.  ६) खाटीकखान्याचे खत – खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते. जॉईन करा @MPSCGeography 🔹यूनेस्को की विश्व विरासत में शामिल भारतीय धरोहर 1. ताजमहल – उत्तर प्रदेश [1983] 2. आगरा का किला – उत्तर प्रदेश [1983] 3. अजंता की गुफाएं – महाराष्ट्र [1983] 4. एलोरा की गुफाएं – महाराष्ट्र [1983] 5. कोणार्क का 0:30TelegramMPSC GeographyHere u can get all useful info about Geography & Agri for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial @MPSCHRD @MPSCCsat

0:300:30च्या हर्षचरितात महेंद्र पर्वत मलय पर्वताशी जोडलेला असल्याविषयीचा उल्लेख मिळतो. पार्जिटरच्या मते महानदी, गोदावरी, वैनगंगा या नद्यांदरम्यानचा प्रदेश अथवा विस्तारांने गोदावरीच्या उत्तरेकडील पूर्व घाटाचा प्रदेश म्हणजे प्राचीन महेंद्र पर्वत असावा. महेंद्रगिरी हे पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर ओरिसा राज्याच्या गंजाम जिल्ह्यात १८° ५८′ उ. अक्षांश व ८४°२४ पू. रेखांशावर, सस. पासून १,५०१ मी. उंचीवर आहे. दाट वनश्री आणि समुद्रसान्निध्य (सु. २५ किमी. अंतरावर) यांमुळे याचा परिसर निसर्गरम्य बनला आहे. ब्रिटिशांच्या काळात महेंद्रगिरी हे कलकत्त्याचे आरोग्यधाम म्हणून विकसित करण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु या टेकडीवजा शिखराच्या तीव्र उताराचा माथा आणि पाण्याचा तुटवडा यांमुळे ती योजना मागे पडली. येथून ‘महेंद्रतनय’ नावांचे दोन प्रवाह उगम पावतात. त्यांतील एक दक्षिणेस वंशधारा नदीस मिळतो, तर दुसरा बारूआ गावाजवळ बंगालच्या उपसागराला मिळतो. या शिखरावर प्रचंड शिळांनी रचलेली अकराव्या शतकातील चार मंदिरे असून त्यांतील एक भग्नाचवस्थेत आहे. मंदिरात संस्कृत आणि तमिळ भाषांतील शिलालेख आहेत. ‘चोल वंशीय राजा राजेंद्र याने आपला मेहुणा विमलादित्य याचा पराभव केल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या जंगलप्रदेशात उभारलेले हे विजयस्तंभ आहेत’, असा उल्लेख त्या शिलालेखांतून आढळतो. जॉईन करा @MPSCGeography 🔹लुशाई टेकड्या लुशाई टेकड्या ईशान्य भारताच्या पर्वतीय प्रदेशातील डोंगर टेकड्या. यांचा विस्तार प्रामुख्याने मिझोराम राज्यात असून त्यांना ‘मिझो टेकड्या’ असेही म्हणतात. आराकान योमा या पर्वतश्रेणीचा हा उत्तरेकडील भाग होय. उत्तर-दक्षिण दिशेत परस्परांना समांतर पसरलेल्या या टेकड्या मुख्यत: तृतीयक कालखंडातील वालुकाश्म व शेल खडकांपासून तयार झाल्या आहेत. या घडीच्या टेकड्यांच्या दक्षिणेस पातकई टेकड्या आहेत. लुशाईच्या पश्र्चिमेस त्रिपुरा सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत लहानलहान आठ रांगा व दऱ्या आहेत. जलप्रवाहांच्या खनन कार्यामुळे या टेकड्यांमध्ये तीव्र उताराच्या खोल दऱ्या, घळ्या वव काही ठिकाणी लहान मैदानी द्रोणी प्रदेश तयार झालेले आहेत. या टेकड्यांचे पश्र्चिमेकडील उतार हे पूर्वेकडील उतारांपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आहेत. पश्चिमेकडे जलप्रवाहांची खोरी रुंद व पूर्वेस अरुंद आढळतात. या प्रदेशात १,३७१ मी. उंचीवर टेकड्यांनी वेढलेली सुपीक गाळाची मैदाने आहेत. मैदानामध्ये चांफाई हे मोठे मैदान (लांबी सु. ११ किमी. व रुंदी ५ किमी.) आहे. गाळाने भरून गेलेल्या पूर्वीच्या सरोवराच्या जागी हे मैदाने तयार झाली असावीत. या टेकड्यांची सस.पासून सरासरी उंची पश्र्चिमेस ९१४ मी. पासून पूर्वेस १,२१८ मी. पर्यंत आढळते; परंतु काही ठिकाणी मात्र ती १,६७५ मी. पर्यंत वाढत जाते. दक्षिण भागात‘ब्लू मौंटन’ वा ‘फ्वंगपूरी’ (२,१६५ मी.) येथे सर्वाधिक उंची आढळते. या प्रदेशातील जलप्रणाली गुंतागुंतीची आहे. उत्तरेस सुरमा नदीची उपनदी बराक, दक्षिणेस कलदन व पश्र्चिमेस कर्णफुली या नद्यांनी हा प्रदेश व्यापलेला आहे. उत्तर भागात ढालेश्र्वरी, सोनई व तुइव्हावल या बराक नदीच्या, तर दक्षिण भागात पूर्वेस मट, तुईचुंग, त्याओ, तुईपाई या कलदन नदीच्या आणि पश्र्चिमेकडील जलप्रणालीमध्ये चितगाँगजवळ तुईचंग, कओ, देह फायरंग व तुईलिपनुई या कर्णफुली नदीच्या मुखालगत येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत. या टेकड्यांच्या प्रदेशातील हवामान मानवी जीवनास प्रतिकूल आहे. खोल दऱ्यांमधून रोगट हवामानामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मार्च-एप्रिलमध्ये वायव्येकडून येणाऱ्याभयानक स्वरूपाच्या वादळी वाऱ्यांचा प्रादुर्भाव होतो. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कोरडा दुष्काळ पडत नाही. उतारावर घनदाट सदारहित जंगले, बांबूंची वने व इतर उपयुक्त वृक्ष आहेत. खोलगट भागात पाम व माथ्यावरील भागात ओक, फर, चेस्टनट इ. वृक्ष आढळतात. या प्रदेशात हत्ती, गेंडा, हरिण, वाघ, अस्वले इ. प्राणीही आढळतात. या प्रदेशात बहुतांश आदिवासी लोक रहात असून ते ‘झूम शेती’ करतात. शेतीतून भात, तीळ, ऊस, तंबाखू व संत्री इ. उत्पादने घेतली जातात. For more updates Join us @MPSCGeography 🔹 सह्याद्रि पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा 0:300:30सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे. ▪️भूवैज्ञानिक इतिहास सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय. ही क्रिया अचानक घडली नसून मंद गतीने घडली असावी. मिआमी विदयापीठातील भूभौतिकीविज्ञ बॅरन व हॅरिसन यांच्या सिद्धांतानुसार सु. १०० ते ८० द.ल. वर्षांपूर्वीच्या दरम्यान मादागास्करपासून विभंगून भारताचा पश्र्चिम किनारा अस्तित्वात आला असावा. या पश्र्चिम किनाऱ्याचे विभंजन होऊन पश्चिम घाट ह्या १,००० मी. उंचीच्या उभ्या कडयाची आकस्मिक निर्मिती झाली असावी. सुमारे ६५ द.ल. वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात भेगी प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक होऊन दक्षिण ट्रॅप (डेक्कन ट्रॅप) ची निर्मिती झाली असावी. लाव्हारसापासून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकाचे विस्तृत व जाड थर असलेल्या या प्रदेशाने मध्य भारताचा फार मोठा भाग व्यापला आहे. अशा ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेल्या संचयनातून पश्र्चिम घाट प्रदेशाची ही भूरचना बनलेली आहे. पश्र्चिम घाटातील अशा बेसाल्ट खडकाच्या खालील खडकांचे थर सु. २०० द.ल. वर्षांपूर्वीचे जुने असावेत. पश्र्चिम घाटाचा उत्तरेकडील गोव्यापर्यंतचा भाग प्रामुख्याने बेसाल्ट खडकांपासून तर त्याच्या दक्षिणेकडील विभाग गॅनाइट व पट्टिताश्म खडकांपासून बनलेला आहे. भूकवचात बेसाल्ट खडकाचे थर साधारण ३ किमी. खोलीपर्यंत आढळतात. चर्नोकाइट, खोंडेलाइट, लेप्टिनाइट, रूपांतरित पट्टिताश्म, स्फटिकमय चुनखडक, लोहखनिज, डोलेराइट व अ‍ॅनॉर्थाइट हे खडकही या भागात आढळतात. दक्षिणेकडील टेकडयांमध्ये अवशिष्ट जांभा खडक व बॉक्साइट खनिज आढळते. ▪️भूविशेष सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वत पुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून प्रामुख्याने पालघाट खिंडीपासूनची (खंड) दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडित झाली आहे. उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व देश (पश्र्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग अलग झाले आहेत. पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकाच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. पश्चिम उतारावर नदयांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. याच उताराच्या पायथ्यालगत कोकणची किनारपट्टी आहे. पूर्वेकडील उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन झालेला दिसतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्व किंवा आग्नेय दिशेकडे अनेक फाटे गेलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेव डोंगररांगा हे प्रमुख फाटे आहेत. पठारावरील नदयांचे हे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्रातील सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक तर दक्षिणेकडे कमी आढळते. सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे, पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. येथपासून कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट सुरू होत असल्याने त्यांना ‘ घाटमाथा ’ असे संबोधले जात असावे. थळ घाट, अणेमाळशेज, बोर घाट, वरंधा, आंबेनळी (पार), कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा, आंबोली इ. घाटांना देश व कोकण यांदरम्यानच्या वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने पूर्वीपासून विशेष महत्त्व आहे. सह्याद्री पर्वतश्रेणी बरीचशी सलग असली, तरी तिच्यात अधूनमधून अशा खिंडी व घाट आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, पाचगण ी यांसारखी गिरिस्थाने वसली आहेत. कळसूबाई (१,६४६ मी.) हे महाराष्ट्रातील तसेच उत्तर सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे. त्याशिवाय साल्हेर (१,५६७ मी.), हरिश्चंद्रगड (१,४२४ मी.), सप्तशृंगी (१,४१६ मी.), त्र्यंबकेश्वर (१,३०४ मी.) ही इतर महत्त्वाची उंच ठिकाणे आहेत. सह्याद्री व त्याच्या वेगवेगळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, विशाळगड यांसारखे अनेक डोंगरी किल्ले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक यांदरम्यान गोवा खंड आहे. वाघेरी (१,०८५ मी.), सोंसोगड (१,१८६ मी.), मोरलेगड (१,०५४ मी.) ही गोव्यातील प्रमुख शिखरे आहेत. सह्याद्रीच्या १६° उत्तर अक्षांश ते निलगिरी पर्वतापर्यंतच्या पर्वतीय प्रदेशाच 0:300:30ा समावेश मध्य सह्याद्रीमध्ये करता येतो. यातील बराचसा भाग कर्नाटक राज्यात आहे. सह्याद्रीचा हा भाग अरबी समुद्राच्या अगदी जवळ आहे. हा प्रदेश ओबडधोबड स्वरूपाचा असून घनदाट अरण्यांचा आहे. कर्नाटकातील सह्याद्रीची सरासरी उंची सु. ६०० ते १,००० मी. आहे. याचा पश्चिम उतार खडया चढणीचा व तुटलेल्या कडयांचा असून पूर्वेकडे गेलेले त्याचे फाटे म्हणजे अवशिष्ट पर्वताच्या रांगा आहेत. म्हैसूरच्या आग्नेयीस बिलीगिरीरंजन श्रेणी असून ती शेवररॉय ( सेर्व्हरायन ) श्रेणीला मिळते. सह्याद्रीच्या येथील प्रमुख श्रेणीस काही स्थानिक नावे प्रचलित आहेत. पुष्पगिरी (१,७१४ मी.), ब्रह्मगिरी, व्हावूल माला (२,३३९मी.) ही येथील महत्त्वाची शिखरे आहेत. उंची व निसर्गसौंदर्य यांसाठी बाबा बुढण डोंगर (१,९२३ मी.), मल्लिआनिगिरी, कुद्रेमुख (१,८९४ मी.) प्रसिद्ध आहेत. नंदी व केमेनगुडी ही गिरीस्थाने आहेत. देवीमने, अगुंबे, शिराडी, चारमाडी इ. घाटमार्गांनी पठारी भाग किनारपट्टीशी जोडला गेला आहे. शरावती नदीवरील गिरसप्पा ( जोग ) धबधबा सह्याद्रीच्या याच भागात आहे. तमिळनाडूच्या पश्चिम सीमेवर निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल असा प्रदेश आहे. निलगिरी पर्वतात उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री व पूर्वघाट एकत्र येतात. या पर्वताची उंची २,००० मी.पेक्षा जास्त आहे. यातच दोडाबेट्टा (२,६३७ मी.) हे निलगिरीतील सर्वोच्च शिखर तर माकूर्ती (२,५५४ मी.) हे दुसरे प्रमुख शिखर आहे. ऊटकमंड हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण निलगिरी पर्वतातच आहे. निलगिरीच्या बहुतेक सर्व सीमा नैसर्गिक रीत्या भंग झालेल्या कडयांच्या आहेत. पालघाट खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता भंग पावली आहे. पालघाट खिंडीची रूंदी २४ किमी. व सस.पासून उंची ३०० मी. असून ही दोन समांतर विभंगांमधील खचदरी असावी. पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील सह्याद्रीचे पूर्व व पश्चिम हे दोन्ही उतार तीव्र व ओबडधोबड बनले आहेत. अन्नमलई ही दक्षिण सह्याद्रीतील प्रमुख पर्वतश्रेणी असून त्या श्रेणीतच अनाईमुडी (२,६९५ मी.) हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे. अनाईमुडी या शृंगबिंदूपासून उत्तरेस अन्नमलई ( उंची १,८०० ते २,००० मी.), ईशान्येस पलनी (९०० ते १,२०० मी.) व दक्षिणेस कार्डमम्‌ (एलाचल) अशा तिन्ही दिशांना तीन डोंगररांगा-टेकडया गेलेल्या आहेत. कोडईकानल (२,१३५ मी.) हे प्रसिद्ध गिरिस्थान पलनी टेकडयांमध्ये आहे. चेंबरा (२,१०० मी.), बांसुरा (२,०७३ मी.), वेल्लरीमाला (२,२०० मी.) व अगस्त्यमलई (१,८६८ मी.), महेंद्रगिरी ही केरळमधील प्रमुख शिखरे व मुन्नार, पानेमुडी, वेनाड ही थंड हवेची ठिकाणे आहेत. केरळ व तमिळनाडू यांदरम्यानच्या वाहतुकीच्या दृष्टीने शेनकोटा खिंड विशेष महत्त्वाची असून या खिंडीच्या दक्षिणेस असलेल्या महेंद्रगिरीने (१,६५४ मी.) दक्षिण सह्याद्रीचा शेवट झालेला आहे. पश्र्चिम घाट व अरबी समुद्र यांदरम्यान अरूंद असे किनारपट्टीचे मैदान आहे. उत्तरेकडील प्रामुख्याने महाराष्ट्रातील किनारपट्टीला कोकण तर साधारणत: गोव्याच्या दक्षिणेकडील किनारपट्टीस मलबारचा किनारा असे म्हटले जाते. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील पायथ्यालगतच्या प्रदेशाला महाराष्ट्रात ‘ देश ’ तर कर्नाटकातील या प्रदेशास ‘ मलनाड ’ असे संबोधले जाते. ▪️नदया भारतातील प्रमुख तीन जलविभाजकांपैकी पश्र्चिम घाट हा एक असून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी व अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नदयांचा तो प्रमुख जलविभाजक आहे. तापी व नर्मदा या नदयांचा अपवाद वगळता भारतीय व्दिपकल्पावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या बहुतेक सर्वच प्रमुख पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या घाटमाथा प्रदेशात उगम पावतात. ही उगमस्थाने अरबी समुद्र किनाऱ्यापासून केवळ ५० ते ८० किमी.वर आहेत. सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या प्रमुख नदया आहेत. याशिवाय इतर असंख्य पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या रांगांमध्ये तसेच त्यांच्या फाटयांमध्ये उगम पावून मुख्य नदयांना जाऊन मिळतात. सह्याद्रीचे पूर्वेकडे गेलेले फाटे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा, मुळा, घोडनदी, नीरा, कोयना, वारणा, पंचगंगा इ. उपनदयांचा उगमही सह्याद्रीतच होतो. कर्नाटक राज्यातून वाहणाऱ्या घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनदयांचा उगम सह्याद्रीमध्येच आहे. घटप्रभेवरील गोकाकजवळील धबधबा सौंदर्य आणि विदयुत् निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे. कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यात पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकडयांमध्ये तळकावेरी येथे झालेला आहे. शिम्शा, हेमवती, कब्बनी, भवानी या उपनदया सह्याद्रीत उगम पावतात. तमिळनाडू राज्यातून पूर्वेकडे वाहणाऱ्या वैगई, चित्तार व तामपर्णी या नदयांचे उगमही पश्र्चिम घाटातच आहेत. पश्र्चिम घाटात उगम पावणाऱ्या आणि पश्चिम किनारपट्टीवरून थोडेच अंतर वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या असंख्य 0:300:30पश्चिम वाहिनी नदया आहेत. पश्चिम वाहिनी नदया संख्येने बऱ्याच असल्या तरी प्रत्येकीचे खोरे तीव्र उताराचे पण मर्यादित आहे. पश्चिम किनारपट्टी अरूंद असल्याने येथील नदया लांबीने खूपच कमी आहेत. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरून वाहणाऱ्या दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल या प्रमुख नदया आहेत. गोव्यातील यापोरा, मांडवी, जुवारी, कर्नाटकातील काळी, गंगावळी, शरावती, बेडती, ताद्री व नेत्रावती तर केरळमधील बेपोर, पोन्नानी, चलाकुडी, पेरियार, कल्लदा या मुख्य पश्र्चिम वाहिनी नदया आहेत. यांपैकी पेरियार ही सर्वांत लांब (२२४ किमी.) नदी आहे. सह्याद्रीची प्रपाती भूरचना असल्यामुळे तीव्र उतारावरून वेगाने वाहताना अनेक नदया कडयांवरून खाली कोसळत असतात. त्यामुळे त्यांच्या मार्गात अनेक प्रेक्षणीय धबधबे निर्माण झाले आहेत. उदा., कर्नाटकात शरावती नदीवरील जगप्रसिद्ध गिरसप्पा ( जोग ) धबधबा ( उंची २५३ मी.) आणि कावेरी नदीवरील प्रसिद्ध शिवसमुद्रम् धबधबा (९७ मी.). तीव्र उतारावरून वेगाने वाहणाऱ्या नदयांमुळे पश्र्चिम घाटात जलविद्युत् निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने अनेक आदर्श ठिकाणे आढळतात. संपूर्ण घाट परिसरात सु. ५० मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रात खोपोली येथे १९०० मध्ये बांधलेले धरण हे पश्चिम घाटातील सर्वांत आधीचे धरण आहे. जलविदयुत् निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोयना, कर्नाटकातील तुंगभद्रा, लिंगनमक्की, केरळमधील पेरांबीकुलम् ही धरणे विशेष महत्त्वाची आहेत. गिरसप्पा व शिवसमुद्रम् हे धबधबेही त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. ▪️हवामान समुद्रसपाटीपासूनची उंची व समुद्रकिनाऱ्यापासूनचे अंतर यांनुसार पश्र्चिम घाटातील हवामानात तफावत आढळते. सामान्यपणे या भागातील हवामान आर्द्र व उष्णकटिबंधीय असून किनाऱ्याजवळ ते सौम्य स्वरूपाचे आढळते. उत्तरेकडील भागात १,५०० मी. उंचीपेक्षा अधिक तर दक्षिण भागात २,००० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशातील हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे असते. आल्हाददायक हवामानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अनेक थंड हवेची ठिकाणे निर्माण झाली आहेत. दक्षिण भागातील वार्षिक सरासरी तापमान २०° से. तर उत्तर भागात २४° से.च्या दरम्यान असते. हिवाळ्यात काही ठिकाणी तापमान गोठणबिंदूपर्यंत खाली जाते. बाष्पयुक्त नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांच्या मार्गात पश्र्चिम घाट येत असल्यामुळे त्या संपूर्ण प्रदेशात विशेषत: घाटमाथा आणि पश्र्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा भरपूर पाऊस पडतो. या भागात घनदाट वने असल्यामुळे सांद्रीभवनास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३०० ते ४०० सेंमी. असून काही ठिकाणी ते ९०० सेंमी.पर्यंत आहे. महाराष्ट्रात घाटमाथ्यावर असलेल्या महाबळेश्वर येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ६२५ सेंमी. आहे. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतार मात्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने तेथे पर्जन्यमान कमी कमी होत गेलेले आहे. दक्षिणेकडील पश्चिम घाट प्रदेशात पावसाळा दीर्घकाळ असतो. ▪️वने पश्र्चिम घाट प्रदेशातील पर्जन्याच्या वितरणातील भिन्नतेनुसार विभिन्न प्रकारच्या वनस्पती आढळतात. २०० सेंमी.पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेल्या पश्र्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूवर उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित किंवा वर्षारण्ये, १५० ते २०० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पश्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूस प्रामुख्याने आर्द्र, सदाहरित अरण्यांच्या पश्र्चिमेस उष्णकटिबंधीय निम-सदाहरित वने, १०० ते १५० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पूर्व उतारावर सदाहरित अरण्यांच्या पूर्वेस उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, तर पूर्वेकडील पायथ्यालगतच्या ७५ ते १२५ सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात. सस.पासून सु. ९०० ते १,८०० मी. उंचीच्या घाट प्रदेशात प्रामुख्याने महाबळेश्वर, निलगिरी व पलनी टेकडयांच्या परिसरात उपोष्ण कटिबंधीय रूंदपर्णी वने असून १,८०० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात, प्रामुख्याने तमिळनाडू व केरळमधील पर्वतीय प्रदेशात, आर्द्र समशीतोष् ण कटिबंधीय वने आढळतात. केरळमधील सदाहरित वने व राष्ट्रीय उद्याने, केरळ व तमिळनाडूमधील वायनाड व मदुमलाई राष्ट्रीय उद्याने, हे पश्र्चिम घाटातील संरक्षित जंगलमय प्रदेश आहेत. पश्चिम घाटाचा संरक्षित ‘ वर्ल्ड हेरिटेज साइट ’मध्ये समावेश करावा अशी मागणी भारत सरकारने २००६ मध्ये ‘युनेस्को मॅब ’कडे केली आहे. अशा स्थळांमध्ये पुढीलप्रमाणे सात प्रमुख विभागांचा व त्यांतील वेगवेगळ्या उपविभागांचा समावेश असेल : (१) अगस्त्यमलई विभाग : यात पुढील पाच उपविभागांचा समावेश असेल : तमिळनाडूमधील अगस्त्यमलई जीवावरणीय राखीव प्रदेश ( क्षेत्र ९०० चौ. किमी.); कालकाड मुदननुराई व्याघ राखीव प्रदेश (८०६ चौ. किमी.); केरळमधील नेय्यर, पेप्परा व शेंदूर्णे वन्यजीव अभयारण्य; 0:300:30त्यालगतचे आचेनकोइल, थेनमाला, कोन्नी, पुनालूर, तिरूअनंतपुरम् विभाग आणि अगस्त्य वनम् विशेष विभाग. (२) पेरियार विभाग : यामध्ये सहा उपविभागांचा समावेश असेल : केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान व निसर्ग राखीव प्रदेश (७७७ चौ. किमी.), रन्नी, कोन्नी व आचनकोइल अरण्य विभाग. पूर्वेकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील प्रामुख्याने शुष्क अरण्यमय प्रदेशातील श्रीविल्लिपुत्तूर वन्यजीव अभयारण्य आणि तिरूनेलवेली अरण्य विभागातील राखीव जंगलांचा प्रदेश. (३) अन्नमलई विभाग : यात सात उपविभागांचा अंतर्भाव असेल : तमिळनाडूमधील चिन्नर वन्यजीव अभयारण्य, एर्नाकुलम् राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), विस्तीर्ण अशा इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य प्रदेशात (९५८ चौ. किमी.) समाविष्ट असणारी इंदिरा गांधी गास हिल्स व करिअन शोला राष्ट्रीय उद्याने, पलनी हिल्स राष्ट्रीय उद्यान (७३७ चौ. किमी.), केरळमधील पेरांबीकुलम् वन्यजीव अभयारण्य (२८५ चौ. किमी.). (४) निलगिरी विभाग : हा विभाग सु. ६,००० चौ. किमी.पेक्षाही अधिक क्षेत्रात विस्तारला आहे. यात सहा उपविभाग समाविष्ट असतील : केरळमधील निलगिरी जीवावरणीय राखीव प्रदेश आणि करिम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० चौ. किमी.), सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), वायनाड वन्यजीव अभयारण्य (३४४ चौ. किमी.), तमिळनाडूमधील बंदीपूर (८७४ चौ. किमी.), माकूर्ती (७८ चौ. किमी.) व मदुमलाई (३२१ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने व न्यू अमरम्बलम् राखीव जंगल. हा विभाग अतिशय जटिल, सुरक्षित व जगातील एक वैशिष्टयपूर्ण अरण्यमय प्रदेश आहे. आशियाई हत्ती, वाघ, गवा व इतर अनेक दुर्मिळ प्राण्यांचे हे आश्रयस्थान आहे. (५) तळकावेरी विभाग : यात सहा उपविभाग आहेत. कर्नाटकातील बह्मगिरी (१८१ चौ. किमी.), पुष्पगिरी (९३ चौ. किमी.) व तळकावेरी (१०५ चौ. किमी.) ही वन्यजीव अभयारण्ये, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान ( नागरहोळे ३२१ चौ. किमी.) आणि केरळमधील अलाराम राखीव जंगल. (६) कुद्रेमुख विभाग : यामध्ये कर्नाटकातील पाच उपविभाग येतात. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान(६०० चौ. किमी.), सोमेश्र्वर वन्यजीव अभयारण्य व सभोवतालची सोमेश्वर, अगुंबे व बाळहळ्ळी राखीव जंगले. (७) सह्याद्री विभाग : यात महाराष्ट्रातील चार उपविभाग येतात. आन्शीप (३४० चौ. किमी.) व चांदोली (३१८ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने. कोयना व राधानगरी ही वन्यजीव अभयारण्ये. सह्याद्री हा जैवविविधतेचा एक खजिना आहे. तेथील सु. २,००० जातींच्या वनस्पतींचा औषधांसाठी वापर केला जातो. ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी ’ने केलेल्या एका अभ्यासानुसार महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री प्रदेशात देवदेवतांच्या नावाने श्रद्धेने संरक्षित केलेल्या वनविभागांत १,६०० पेक्षा जास्त ‘देवराया ’ आहेत. सह्याद्रीमध्ये अनेक राष्ट्रीय उद्याने, वन्यप्राणी, अभयारण्ये, राखीव व संरक्षित वने निर्माण करणे शक्य झाले आहे. येथील पर्यटनाची अनेक ठिकाणे आर्थिक क्षेत्रे असल्याने पश्र्चिम घाट विकसित होत आहे. सह्याद्रीमुळे पश्चिम किनारपट्टीवर पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे नदयांच्या खोऱ्यांत जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्पांची निर्मिती सुलभ झाली आहे. येथील जंगलांतून लाकूड व इतर अनेक वनोत्पादने तसेच दक्षिण सह्याद्रीतून चहा, कॉफी, रबर, मसाल्याचे पदार्थ इ. उत्पादने मिळतात. वाहतूक व व्यापाराच्या दृष्टीने पश्र्चिम घाटातील खिंडी व घाट महत्त्वाचे ठरले आहेत. अनेक कवींनी व लेखकांनी सह्याद्रीचे सौंदर्य वर्णिले आहे. वायनाड अरण्याचा प्रदेश म्हणजे उत्तरेकडील व दक्षिणेकडील घाट प्रदेशाचा संक्रमण भाग आहे. दक्षिणेकडील भाग आर्द्र असल्याने तेथे वनस्पतींच्या असंख्य जाती आढळतात. केरळमध्ये या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तेथे दाट अरण्ये आहेत. ‘ सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान ’ हा भारतातील अतिशय महत्त्वाचा, विषुववृत्तीय सदाहरित अरण्यांचा प्रदेश आहे. वृक्षतोडीमुळे उघडया पडलेल्या प्रदेशात गवताळ प्रदेशांची निर्मिती झालेली दिसते. मुख्यत: कर्नाटकातील पश्र्चिम घाट प्रदेश व निलगिरी पर्वतीय प्रदेशात असे विस्तृत गवताळ प्रदेश आहेत. पूर्वी पश्र्चिम घाट प्रदेशात घनदाट अरण्ये होती. जं गलात राहणाऱ्या आदिवासी जमातींना उदरनिर्वाहासाठी पुरेशा प्रमाणात फळे, कंदमुळे इ. सहज उपलब्ध होत असत. प्रदेशाच्या दुर्गमतेमुळे सखल भागातील लोकांना अशा अरण्यमय भागात येऊन शेती करणे किंवा वसाहती स्थापन करणे शक्य नव्हते. त्यामुळे जंगले सुरक्षित होती. परंतु ब्रिटिशांचे आगमन झाल्यानंतर प्रामुख्याने मळ्यांच्या लागवडीसाठी व त्यानंतर इतर कारणांसाठी मोठया प्रमाणावर जंगलतोड केली गेली. ▪️जैवविविधता पारिस्थितीकीयदृष्टया पश्र्चिम घाटाला विशेष महत्त्व आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर अतिशय समृद्ध आहे. अनेक जातींचे प्राणी, पक्षी व असंख्य प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्चिम घाटाचा आठवा क्र 0:300:30मांक लागतो. पारिस्थितीकी वैज्ञानिक नॉर्मन मेअर्स यांच्या प्रयत्नांमुळे १९८८ मध्ये पश्र्चिम घाट परिसर पारिस्थितीकीयदृष्टया अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. भारताच्या क्षेत्रफळाच्या केवळ ५% भूमी या प्रदेशाने व्यापली असली तरी भारतातील उच्च दर्जाच्या २७% वनस्पती ( सु. ४,००० ते १५,००० जाती ) येथे आढळतात. त्यांपैकी १,८०० जातींच्या वनस्पती केवळ याच प्रदेशात पाहावयास मिळतात. त्यामुळे या वनस्पती म्हणजे या प्रदेशाची वैशिष्टये बनली आहेत. सुमारे पाच हजारांवर फुलझाडांच्या जाती पश्र्चिम घाट परिसरात असून त्यांपैकी सु. १,६०० फुलझाडांचे प्रकार जगात कोठेही आढळत नाहीत. पश्र्चिम घाटातील पर्वतश्रेण्या म्हणजे असंख्य वन्य प्राण्यांची महत्त्वाची आश्रयस्थाने आहेत. या संपूर्ण परिसरात किमान १३९ सस्तन प्राण्यांच्या जाती, १७९ जल – स्थलचर ( उभयचर ) वर्गातील प्राण्यांच्या जाती व ५०८ पक्ष्यांच्या जाती आढळतात. त्यांपैकी सस्तन प्राण्यांच्या ७, उभयचर प्राण्यांच्या ८४ व पक्ष्यांच्या १६ जाती जगात अन्य कोठेही आढळत नाहीत. जगाच्या अन्य भागांतून नामशेष किंवा दुर्मिळ झालेल्या किमान ३२५ प्राण्यांच्या जाती येथे आढळतात. येथील मोठया ठिपक्यांचे जंगली कस्तुरी मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. येथे माकडांची संख्याही प्रचंड आहे. मोठया शेपटीच्या माकडांची संख्या सायलेंट व्हॅली व कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानांत सर्वाधिक आहे. विविध जातींच्या गोगलगाई, सरपटणारे प्राणी, वटवाघुळे, फुलपाखरे यांची संख्या प्रचंड आहे. एकटया केरळमधील पश्चिम घाट परिसरात सु. ६,००० जातींचे कीटक आहेत. फुलपाखरांचे ३३४ प्रकार येथे आढळतात. येथील प्रवाहांमधून विविधरंगी मासे पाहावयास मिळतात. निलगिरी पर्वतीय प्रदेशात हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इ. पाणी आढळतात. त्यांच्यासाठी मदुमलाई येथे अभयारण्य राखून ठेवलेले आहे. निलगिरी पर्वतात हत्तींची संख्या सर्वाधिक आहे; तसेच बह्मगिरी व पुष्पगिरी वन्यप्राणी अभयारण्ये, बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान व अन्नेकल राखीव जंगलात हत्तींची संख्या पुष्कळ आहे. कर्नाटकातील पश्चिम घाट प्रदेशात सु. सहा हजारांवर हत्ती व देशातील १०% दुर्मिळ जातींचे वाघ आहेत ( सन २००४). देशातील सुंदरबन व्यतिरिक्त वाघांची संख्या अधिक असणारा पश्चिम घाटातील सलग अरण्यांचा प्रदेश कर्नाटक, तमिळनाडू व केरळमध्ये पसरला आहे. पश्चिम घाटात गवे मोठया प्रमाणात आढळतात. कर्नाटकातील बंदीपूर राष्ट्रीय अभयारण्य व नागरहोळे या दोन प्रदेशांत सु. पाच हजारांवर गवे आहेत. महाराष्ट्रात दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. निलगिरी लंगूर मोठया संख्येने कोडगू जंगलात आढळतात. भारतीय मंटजॅक हरणे भद्रा वन्यप्राणी अभयारण्यात तसेच चिकमगळूरच्या राखीव व्याघ प्रकल्प प्रदेशात मोठया संख्येने आहेत. ब्राझीलमधील रिओ दे जानेरो येथे झालेल्या ‘ जागतिक वसुंधरा ’ परिषदेमध्ये (१९९२) पश्र्चिम घाटाची गणना जगातील अठरा अतिसंवेदनशील ( हॉटस्पॉट ) अशा पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे. भारत सरकारने येथील जैवविविधतेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यादृष्टीने दोन जीवावरणीय राखीव प्रदेश, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक वन्यप्राणी अभयारण्ये व राखीव जंगलांची घोषणा केली आहे. जॉईन करा @MPSCGeography 🔹सागरी प्रवाह सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. समुद्र व महासागरातील पाणी स्थिर नसून त्यात भरती-ओहोटी,सागरी लाटा व सागरी प्रवाह अशा तीन प्रकारच्या हालचाली होत असतात. त्यांपैकी सागरी प्रवाह ही प्रमुख हालचाल आहे. सागरी प्रवाह मार्गाने पाणी एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वाहत असते. तसेच सागरी प्रवाहांमुळे सागरपृष्ठापासून सागरतळापर्यंत अभिसरण चालू राहते. वाऱ्याची सागरजलाशी होणारी घर्षणक्रिया, वेगवेगळ्या जलस्तरांधील घर्षणक्रिया, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारी कोरिऑलिस प्रेरणा (भूवलनोत्पन्न प्रेरणा), सागरजलाचे तापमान, लवणता व घनतेतील तफावत इ. वेगवेगळ्या नैसर्गिक प्रेरणांवर सागरी प्रवाहांची निर्मिती, त्यांची दिशा व आकार अवलंबून असतो. खंडांचे आकार व त्यांची सापेक्ष स्थाने, प्रवाळशैलभित्ती व प्रवाळबेटे, स्थानिक वारे या घटकांचाही सागरी प्रवाहांवर प्रभाव पडत असतो. या वेगवेगळ्या घटकांमधील भिन्नतेमुळे काही प्रवाह मोठे, काही लहान, काही कायमस्वरूपी, काही हंगामी, काही अधिक गती असणारे तर काही मंद गतीने वाहणारे आढळतात. वाऱ्याचे घर्षणकार्य व दाबातील फरकाद्वारे कार्य करणारी गुरुत्वीय प्रेरणा ही सागरी प्रवाह निर्मितीची मूळ कारणे आहेत. सागरपृष्ठाशी वाऱ्याकडून होणारे घर्षण आणि उभ्या व आडव्या दिशांत असणारा पाण्याच्या घनतेतील किंवा गुरुत्वातील फरक यांमुळे पाणी वाहण्यास सुरुवात होते. सागरी प्रवाहाचे पृष्ठीय प्रवाह, घनतेतील फरकाने निर्माण झालेले प्रवाह, खोल सागरातील प्रवाह असे प्रकार पाड 0:300:30ता येतात. समुद्राच्या पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणात दीर्घकाळ व एकसारखा वारा वाहत असल्यास त्याच्या घर्षण कार्यामुळे काही ऊर्जा पाण्यात संक्रमित झाल्यामुळे सागरपृष्ठावरील पाणी प्रवाहित होते. यालाच ‘पृष्ठीय प्रवाह’ असे म्हणतात. वाऱ्याचा प्रभाव सामान्यपणे सागरातील १००–२०० मी. खोलीपर्यंतच्या पाण्यावर होतो. असे असले तरी वाऱ्याच्या घर्षण कार्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रवाहांचा विस्तार १,००० मी. किंवा त्यापेक्षाही अधिक खोलीपर्यंत आढळतो. स्थूलमानाने असे प्रवाह प्रचलित वाऱ्याच्या दिशेला अनुसरून वाहत असले, तरी ते अगदी बरोबर वाऱ्याच्या दिशेने वाहत नाहीत. पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात आपल्या मूळ दिशेच्या उजवीकडे, तर दक्षिण गोलार्धात मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. सागरी प्रवाहांचे हे विचलन वाऱ्याच्या दिशेपासून साधारणतः ४५० नी होते. कोरिऑलिस प्रेरणेमुळेच सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेला अनुसरून, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्घ दिशेने वाहतात. याच प्रेरणेमुळे खंडांच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या प्रवाहांच्या विरुद्घ दिशेने खंडांच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाह वाहतात. वाऱ्यापेक्षा प्रवाहांचे विचलन अधिक होत असले, तरी वाऱ्यापेक्षा त्यांचा वेग कमी असतो. वारे आणि कोरिऑलिस प्रेरणा यांमुळे नियमन होत असणाऱ्या अटलांटिक, पॅसिफिक व हिंदी महासागरातील प्रवाहांचा विस्तृत भोवऱ्यासारखा (गोलाकार) एक विशिष्ट आकृतिबंध तयार होतो. ध्रुवीय प्रदेश वगळता विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिण भागांत पृष्ठीय सागरी प्रवाह गोलाकार वाहतात. व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे अटलांटिक, पॅसिफिक व हिंदी महासागरांच्या विषुववृत्तीय भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे उत्तर विषुववृत्तीय (उत्तर गोलार्ध) व दक्षिण विषुववृत्तीय (दक्षिण गोलार्ध) असे दोन सागरपृष्ठीय प्रवाह आहेत. सागरजलात समपातळी राखण्याच्या गुरुत्वाकर्षणीय प्रेरणेमुळे या दोन मोठ्या प्रवाहांच्या दरम्यान त्यांच्या विरुद्घ दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे विषुववृत्तीय प्रतिप्रवाह आढळतात. या प्रवाहांची व्याप्ती कमी आहे. उत्तर हिंदी महासागर वगळता अटलांटिक व पॅसिफिकमधील दोन्ही विषुववृत्तीय प्रवाह महासागरांच्या पश्चिम भागातून खंडांच्या किनाऱ्याजवळून ध्रुवीय प्रदेशाकडे वाहू लागतात. उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळील या प्रवाहाला गल्फ प्रवाह, दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला ब्राझील,आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला मोझँबीक व अगुल्हास, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला पूर्व ऑस्ट्रेलिया तर आशियाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला कुरोसिवो या नावाने संबोधले जाते. खंडांच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहणारे हे प्रवाह मध्य कटिबंधात आल्यावर पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे दिशा बदलून पूर्वेकडे खुल्या महासागराकडे वाहू लागतात. या ठिकाणी त्यांचा वेग मंदावलेला असतो; त्यामुळे त्यांना सामान्यपणे प्रवाहांऐवजी ड्रिफ्ट्स असे संबोधले जाते. उत्तर गोलार्धात अशा मंद गतीने वाहणाऱ्या प्रवाहांमध्ये उत्तर अटलांटिक, उत्तर पॅसिफिक या मुख्य प्रवाहांचा आणि त्यांच्या नॉर्वेजियन व अलास्का या शाखांचा समावेश होतो. गल्फ प्रवा ह उत्तर अटलांटिक प्रवाहात, तर कुरोसिवो प्रवाह उत्तर पॅसिफिक प्रवाहात मिसळतो. कुरोसिवो, उत्तर पॅसिफिक, गल्फ, उत्तर अटलांटिक व नॉर्वेजियन प्रवाह उबदार पाणी आर्क्टिक महासागराकडे वाहून नेतात. हे सागरी प्रवाह पुन्हा आपली दिशा बदलून खंडांच्या पश्चिम किनाऱ्याने विषुववृत्ताकडे वाहू लागतात. अटलांटिकमध्ये त्यांना कानेरी (उत्तर गोलार्ध) व बेंग्वेला (दक्षिण गोलार्ध) या नावांनी, पॅसिफिकमध्ये कॅलिफोर्निया (उत्तर गोलार्ध) व पेरू किंवा हंबोल्ट (दक्षिण गोलार्ध) ह्या नावांनी, तर हिंदी महासागरात पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाह या नावाने ते ओळखले जातात. हे सर्व सागरी प्रवाह पुन्हा तीनही महासागरांमधील उत्तर किंवा दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहांना मिळतात. अशा प्रकारे हे प्रवाह गोलाकार चक्र पूर्ण करतात. गोलाकार फिरणाऱ्या या प्रवाहांच्या केंद्रस्थानी तुलनेने शांत सागरी भाग आढळतात. उदा.,उत्तर अटलांटिकमध्ये गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे (पूर्वेस) व दक्षिणेस असलेला सारगॅसो समुद्र. या समुद्राचे पाणी उच्च क्षारतेचे व उबदार असते. गल्फ-उत्तर अटलांटिक प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आल्यावर तेथे त्याच्या कानेरी व नॉर्वेजियन अशा दोन शाखा होतात. दक्षिणेकडे जाणारी शाखा कानेरी या नावाने ओळखली जाते. उत्तरेकडे जाणारी नॉर्वेजियन शाखा ब्रिटिश बेटे, नॉर्वे यांच्या किनाऱ्याजवळून वाहत जाऊन आर्क्टिक महासागरात विलीन होते. आर्क्टिक महासागराकडून उत्तर अटलांटिकमध्ये येणाऱ्या पूर्व ग्रीनलंड व लॅब्रॅडॉर या थंड प्रवाहांचा न्यू फाउंडलंड बेटाजवळ गल्फ या 0:300:30उष्ण प्रवाहाशी, तर आर्क्टिक महासागराकडूनच उत्तर पॅसिफिकमध्ये येणाऱ्या ओयाशियो (ओखोट्स्क किंवा कॅमचॅटका) या थंड प्रवाहाचा जपानच्या किनाऱ्याजवळ कुरोसिवो या उष्ण प्रवाहाशी संयोग होतो. दक्षिण गोलार्धात साधारण याच अक्षांशाच्या दरम्यान बहुतेक सर्वत्र महासागरी भाग असून तेथे या विषुववृत्तीय प्रवाहांचा संयोग ‘वेस्ट विंड ड्रिफ्ट’ या विस्तृत प्रवाहाशी होतो. तेथे या प्रवाहांना वैयक्तिक नावे नाहीत. पृष्ठीय प्रवाहांपैकी गल्फ, कुरोसिवो व अगुल्हास हे तीनही प्रवाह अधिक वेगवान व प्रभावी आहेत. त्यांचा वेग दर ताशी ६ किमी. असतो. ब्राझील व पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाह त्यामानाने संथ आहेत. हिंदी महासागराच्या उत्तर भागात ऋतुमानानुसार वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे तेथील सागरी प्रवाहांत बदल घडून येतात. पृष्ठीय प्रवाहांच्याखालून वेगवेगळ्या खोलीवर विरुद्घ दिशेने वाहणारे वेगवेगळे उपपृष्ठीय प्रवाह आढळतात. उदा., पॅसिफिकमधील क्रॉमवेल, अटलांटिकमधील गल्फप्रतिप्रवाह. सागरजलाच्या लवणतेतील भिन्नतेनुसार घनतेतही भिन्नता निर्माण होते. अधिक लवणता असलेल्या पाण्याची घनता अधिक असते. पाण्याचे भिन्नघनतेचे थर एकमेकांजवळ आल्याने किंवा सागरपृष्ठावर उतार निर्माण झाल्याने अथवा या दोन्हींमुळे क्षितिजसमांतर दिशेत दाबामध्ये फरक निर्माण होऊनगुरुत्वप्रचलित प्रवाह निर्माण होतात. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीत या दोन्ही प्रकारच्या प्रेरणा कार्य करतात. भूमध्य समुद्राचे जड पाणी पूर्वेकडील भागातखाली दाबले जाऊन निर्माण झालेला खोल सागरी प्रवाह खालच्या थरातून पश्चिमेस अटलांटिक महासागराकडे जातो. याउलट अटलांटिकमहासागरातील कमी क्षारतेचे हलके पाणी पृष्ठभागावरून पूर्वेस भूमध्य समुद्राकडे येते. तांबडा समुद्र, इराणचे आखात आणि हिंदी महासागर यांदरम्यानतसेच बाल्टिक समुद्रात असेच सागरी प्रवाह आढळतात. बाल्टिक समुद्रातील प्रवाहाच्या बाबतीत मात्र आत येणारे पाणी जड म्हणून खालच्या थरातून येतेव हलके पाणी वरच्या थरातून बाहेर जाते. सागरी प्रवाह निर्मितीवर लवणतेबरोबरच तापमानाचाही परिणाम होतो. कमी अक्षवृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे सामान्यपणे पाण्याची पातळीकिंचित अधिक राहते. त्यामुळे कमी अक्षवृत्तीय (विषुववृत्तीय) प्रदेशाकडून उच्च अक्षवृत्तीय प्रदेशाकडे पाण्याचे प्रवाह वाहत जातात. हवेचा दाब जास्तअसलेल्या भागात पाण्याची पातळी कमी राहते, तर हवेचा दाब कमी असल्यास पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे जास्त पातळीच्या प्रदेशाकडून कमीपातळी असलेल्या जलभागाकडे सागरी प्रवाह वाहू लागतात. मोठ्या महासागरी गोलाकार प्रवाहांशिवाय लहानलहान विस्ताराचे अनेक प्रवाह काही समुद्र किंवा महासागराच्या बंदिस्त भागांत आढळतात.त्यांच्या अभिसरण प्रक्रियेवर कोरिऑलिस प्रेरणेपेक्षा सागरी भागाकडे वाहत येणाऱ्या पाण्याच्या दिशेचा परिणाम होतो. असे सागरी प्रवाह टास्मानियासमुद्रात आढळतात. खोल सागरी भागातील अभिसरण प्रामुख्याने तापमान व लवणता यांच्यातील फरकावर अवलंबून असते.ही परिस्थिती प्रामुख्याने थंड प्रदेशात आढळते. सागरी पाण्याच्या तापण्यातील असमानता ही विशेषतः खोल सागरी भागातील पाण्याच्या हालचालीचे प्रमुख कारण आहे. ध्रुवीय प्रदेशात मुख्यतःहिवाळ्यात अतिथंड, अधिक लवणता व घनता असलेले पाणी पृष्ठभागापासून खूप खाली दाबले जाते. जादा घनतेमुळे पृष्ठभागावरील पाणी ज्या ठि काणीखाली जाऊ लागते, तेथून उभ्या दिशेतील अभिसरणाला सुरुवात होते. महासागरातील उभी अभिसरण क्रिया विशेष जोरदार नसली, तरी महत्त्वाचीअसते; कारण त्यामुळे खोल सागरी पाणी पृष्ठभागावर येते व पृष्ठभागावरील पाणी खाली जाते. खाली दाबले गेलेले जड पाणी खालच्या थरातून अतिशय मंद गतीने विषुववृत्तीय प्रदेशाकडे वाहू लागते. त्याच वेळी उष्णकटिबंधातील उबदार व कमी घनतेचे पाणी सागरपृष्ठावरून ध्रुवीय प्रदेशाकडे वाहू लागते. अशा अभिसरणाची प्रमुख दोन उगमस्थाने आहेत : वेडेल समुद्र हे पहिले उगमस्थान. वेडेल समुद्रात सर्वमहासागरांमधील जड पाणी खाली जाऊन ‘अंटार्क्टिका तळ जलराशी’ बनते. हिमाच्छादित अंटार्क्टिकाच्या किनाऱ्याजवळ या प्रवाहाचे पाणी ‘वेस्ट विंड ड्रिफ्ट्’ या नावाने अटलांटिक, हिंदी व पॅसिफिक महासागरांच्या तळावरून विषुववृत्ताच्या बरेच उत्तरेला वाहत जाते. हा जगातील सर्वांत मोठा तसेच संपूर्ण पृथ्वीला वळसा घालणारा प्रवाह आहे. दक्षिण गोलार्धातील इतर प्रवाहांवर या प्रवाहाचा विशेष प्रभाव पडतो. हा सागरी प्रवाह अतिखोल, थंड व तुलनेने मंद गतीचा परंतु प्रचंड प्रमाणात (गल्फ प्रवाहाच्या सु.दुप्पट) पाणी वाहून नेणारा आहे. पेरू,बेंग्वेला प्रवाह याच अंटार्क्टिक प्रवाहाचे पाणी वाहून आणत असल्याने ते थंड प्रवाह आहेत. आइसलँड व ग्रीनलंड यांच्या मधील इर्मिंजर समुद्र आणि ग्रीनलंड व लॅब्रॅडॉर यांच्यामधील सागरी प्रदेश हे अभिसरणाचे दुसरे उगमस्थान आहे. हिवाळ्यात या भागातील थंड व जड पाणी खाली दाबले जाऊन ‘अटलांटिक गभीर जलराशी’ बनते. आर्क्टिक महास 0:300:30ागरात यातील पाणी गोलाकार फिरते. सायबीरियन किनारा पार करून पुढे आल्यानंतर उत्तर अटलांटिकमध्ये ते पाणी ग्रीनलंड बेटाभोवती गोलाकार फिरते. आर्क्टिकभोवती सलग खुला महासागर नसल्याने तेथे प्रभावी परिध्रुवीय प्रवाह आढळत नाहीत. तेथे दक्षिणेकडे वाहणारे कमी व्याप्तीचे थंड प्रवाह आहेत. उदा., रशियाच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहणारा ओयाशियो प्रवाह, उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणारा कॅलिफोर्निया प्रवाह, ग्रीनलंड बेटाभोवती वाहणारे लॅब्रॅडॉर व पूर्व ग्रीनलंड प्रवाह. ▪️सागरी प्रवाहाची वैशिष्ट्ये सागरी प्रवाहांची वैशिष्ट्ये अतिशय गुंतागुंतीची व सातत्याने बदलणारी आढळतात. काही प्रमुख व सर्वसाधारण वैशिष्ट्ये याप्रमाणे सांगता येतील : १) सागरी प्रवाह किनाऱ्याच्या अगदी जवळून वाहत नाहीत. त्यांचा विस्तार सामान्यपणे सागरमग्न खंडभूमीच्या सीमेपर्यंत आढळतो. २) उत्तर गोलार्धातील उत्तर पॅसिफिक व उत्तर अटलांटिकमध्ये मुख्य प्रवाह घड्याळकाट्याच्या दिशेला अनुसरून गोलाकार वाहतात. महासागरांच्या पश्चिम भागात ते उत्तरेकडे, तर पूर्व भागात ते दक्षिणेकडे वाहतात. दक्षिण गोलार्धात याच्या उलट परिस्थिती असते. ३) दोन्ही गोलार्धातील गोलाकार भोवरे (जायरेट) एकसारख्या आकाराचे नाहीत. ४) दोन गोलाकार भोवऱ्यांच्या मध्ये विषुववृत्तीय प्रतिप्रवाह आढळतात. ५)खंडांच्या दक्षिण भागांत प्रवाह पश्चिम-पूर्व दिशेत वाहतात. ६) सागरी प्रवाहांचा सर्वाधिक वेग महासागरांच्या पश्चिम भागात आढळतो. उदा., गल्फआणि कुरोसिवो प्रवाहांचा वेग दरताशी ६ किमी. असतो. ७) सागरी प्रवाहांचा वेग जरी कमी असला, तरी त्यांबरोबर वाहून नेले जाणारे पाणी प्रचंडप्रमाणात असते. उदा., फ्लॉरिडा सामुद्रधुनीतून प्रतिसेकंद सु. २५ द. ल. टन पाणी वाहत असते. न्यूयॉर्कच्या अपतट भागातून वाहणाऱ्या गल्फ प्रवाहातूनयाच्या जवळजवळ दुप्पट पाणी वाहत असते. ८) जगातील सर्वांत मोठा प्रवाह अंटार्क्टिका खंडाभोवतीचा असून त्यातून प्रतिसेकंद सु. १०० द. ल. टनपाणी वाहत असते. ▪️सागरी प्रवाहांचे परिणाम अठराव्या शतकापासून मार्गनिर्देशनासाठी सागरी सफरी निघू लागल्या. तेव्हापासून सागरी सफरींच्या दृष्टीने सागरीप्रवाहांचा अभ्यास होऊ लागला. त्यानंतर हवा व हवामानावर होणाऱ्या परिणामांच्या दृष्टीने सागरी प्रवाहांचा अभ्यास केला जाऊ लागला. सागरी प्रवाहांच्याअभ्यासावरून त्यांच्या वेगवेगळ्या परिणामांची माहिती उपलब्ध झाली. शुष्कता, भारी वर्षण, दाट धुकेयुक्त हवा हे अपतट सागरी प्रवाहाचे काही परिणामदिसून येतात. ज्या भागातून उष्ण किंवा थंड प्रवाह सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहत असतात, तेथील किनारी प्रदेशाच्या हवामानावर त्या प्रवाहाचापरिणाम होतो. पश्चिम यूरोप, दक्षिण अलास्का व जपानच्या किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या उष्ण प्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामानउबदार बनले; अन्यथा तेथील हवामान तीव्र व असह्य स्वरूपाचे राहिले असते. गल्फ प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क, ग्रेट ब्रिटन वनॉर्वेमधील बंदरे हिवाळ्यात न गोठता सागरी वाहतुकीसाठी खुली राहतात. अशाच प्रकारे जपान व उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याचे हवामानहिवाळ्यात उबदार राखले जाते. उबदार पाणी व उबदार हवामानामुळे बाष्पीभवन अधिक होऊन लगतच्या किनारी प्रदेशातील वृष्टिमान वाढते. याउलटदक्षिण गोलार्धात पेरू व बेंग्वेला हे थंड सागरी प्रवाह दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा व आफ्रिकेच्या नैर्ऋत्य किनाऱ्याजवळून वाहत असल्याने तेथे दाटधुके निर्माण होते व हवामान थंड राहते; परंतु वृष्टी होत नाही. परिणामतः पेरू, चिली व नैर्ऋत्य आफ्रिका (नामिबिया) येथे ओसाड वाळवंटी प्रदेशांचीनिर्मिती झाली आहे. सागरी प्रवाह व वातावरणीय अभिसरण क्रिया यांचा परस्परांवर परिणाम होत असतो. उदा., पश्चिम पॅसिफिकवरील आवर्ती उबदार व आर्द्र वाऱ्यांचेअभिसारी प्रवाह पूर्वेकडे स्थलांतरित होतात, तेव्हा पूर्व पॅसिफिकमधील पाणी उबदार बनून एल् निनो परिणाम जाणवू लागतात. त्याचे तेथील हवा वहवामानावर गंभीर परिणाम दिसून येतात. ऑस्ट्रेलियात अवर्षण, कॅलिफोर्नियात वादळ तर उत्तर अमेरिकेच्या मध्यवर्ती भागातील हिवाळे उबदारराहतात. पेरू व चिलीच्या मत्स्योद्योगावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. सागरी प्रवाहांबरोबर ध्रुवीय प्रदेशाकडून हिमनग वाहत येतात. असे हिमनग सागरी वाहतूक मार्गावर आले, तर जहाजांना ते फार धोकादायकठरतात. सागरी प्रवाह सागरी जीवांना पोषक ठरतात. उष्ण व थंड प्रवाह जेथे एकत्र येतात, तेथे प्लवक या माशांच्या मूलभूत खाद्याची विपुल प्रमाणात वाढहोते. त्यांवर माशांची चांगली पैदास होऊन असे प्रदेश प्रसिद्घ मत्स्यक्षेत्रे बनली आहेत. उदा., अटलांटिक व पॅसिफिक महासागरांचे वायव्य व ईशान्य भाग,दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा. ह्या समृद्घ मत्स्यक्षेत्रांच्या निर्मितीमागील वेगवेगळ्या कारणांपैकी उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संयोग हे एक महत्त्वाचेकारण आहे. सागरी प् 0:300:30रवाह नसते, तर समुद्र व महासागरांतील पाणी संचित राहिले असते. अशा पाण्यात सजीवांना आवश्यक खाद्याचा पुरवठा झालानसता. परिणामतः सागरी जीवसृष्टी व तेथील परिसंस्था मर्यादित राहिल्या असत्या. 🔷 कोकणची ‘रापण संस्कृती’ रापण हा कोकण किनारपट्टीच्या सागरी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग. रापण’ संस्कृतीला कोकणच्या सामाजिक व सांस्कृतिक जडण-घडणीत फार मोलाचं स्थान आहे. पण कोकणच्या मच्छीमारांना वर्षानुवर्ष एका बंधनात जोडणारा रापणीचा दोरखंड आज आठवणीत जमा होत चाललाय. ‘पर्सिसन मासेमारी हे त्यामागचं कारण. म्हणूनच या रापण संस्कृतीच्या पाऊलखुणा कोकणी माणसाने जपून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. कोकणात नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीचा शुभारंभ होतो. पण मासेमारी भरात येते ती दिवाळीच्या दरम्यानच. आता रापणीची जागा लहान-मोठय़ा पातींनी घेतली. आंब्याच्या होडीची जागा (गाबीत लोक त्याला पगार म्हणत) जेव्हा फायबर बोटींनी घेतली त्याचवेळी रापण संस्कृतीच्या मावळतीचे ढग कोकण किनारपट्टीवर जमू लागले. ब-याच किनारपट्टीवरील मोठाल्या रापणी कधीच बंद झाल्या. आता काही भागात उरल्यात त्या हात रापणी आणि छोटय़ा रापणी. पूर्वी 90-95 पाटय़ांच्या मोठाल्या रापणी असायच्या. एका रापणीशी 50-60 रापणकर मच्छीमार बांधील असायचे. त्या कुटुंबातील 200-250 माणसांसाठी ती रापणच तारणहार असायची. एका माणसासोबत तीन-चार माणसं वावरायची. रापणीच्या माणसाची पेज, जेवण पोहोचवणं, वाटय़ाचे मासे विकणं, खारवणं आदी सर्व कामं घरातीलच माणसं करायची. आपली रापण कंपनीच आपली ‘जीवन तारणहार’ आहे, असं समजूनच सर्व वागत. रापण सुकवणं, वाळत घालणं, त्याला आगूळ देणं, तुटलेल्या रापणीचे पाटे शिवणं, जाळी होडीवर चढवणं, मासोळ्यांचा अंदाज घेणं आणि मासळीचा अंदाज घेत ‘एलाम्बे.. हैले याल्लाऽऽऽ’ अशी हमावणी गात गात रापणीची होडी समुद्रात लोटणं, हे सारंच पाहण्यासारखं असे. एका सुरात, एका तालात हमावण्या म्हणणारे मच्छीमार सागराच्या सौंदयरेपासनेचं आणि मानवाच्या निर्भयतेचं वेगळंच दर्शन घडवत. सर्व मच्छीमारांचा वावर समुद्रालगतच्या त्यांच्या मांगरीतच असायचा. त्यामुळे समुद्रावर जीता-जागता पाहारा अष्टौप्रहर असायचा. रापणीच्या मोठाल्या जाळ्याच्या निगराणीसाठी वेगवेगळी साधनं वापरली जात. त्यांची नावं आणि अस्तित्वही आता कोकण किनारपट्टीवरून अस्तंगत झालं आहे. दोन रापणीची कपी अडकवण्यासाठी ‘शिवाजी’, मासळी सुकत घालण्यासाठी उथळ अशी ‘शितरी’, कुटी सुकत घालण्यासाठी ‘भगांरी’, मासळी एकत्र करण्यासाठी ‘लाकडी खोरं’, समुद्रावरती रापणीचे दोर बनवण्यासाठी वापरण्यात येणारा ‘घुगरा’, माशांची वाहतूक करण्याकरता ‘येंडकुल’ नावाच्या जाळ्याचं फाळकं, रापण ओढण्याकरता लाकडी टांगूल आणि हरास, होडीतलं पाणी बाहेर काढण्याकरता वापरण्यात येणारे शेलना आणि मासळीच्या मोजमापाकरता चिव्यांच्या काठय़ांच्या बेळाचा भलामोठा मण, अशी विविध रापणीची साधनं आता पाहायला मिळणंही कठीण आहे. रापण समुद्रातून ओढल्यावर तिचा लिलाव होई. लिलावाचा वाटा रापण संघाशी संबंधित असलेल्या प्रत्येक मच्छीमाराला मिळायचाच. तोच तर त्याचा रोजगार होता. पण त्या व्यतिरिक्त पाच वाटे जादा काढले जायचे. त्यातील एक वाटा रापण संघाचा फंड म्हणून काढला जायचा. या वाटय़ातून जमा होणारी रक्कम वर्षभर एकत्र करून निवृत्त होणाऱ्या मच्छीमारांना निवृत्तीफंड देण्यात येत असे. दुसरे दोन वाटे ‘शिमगा’ आणि ‘दिवाळीचे’ काढले जात. त्या दोन वाटय़ांतून वर्षभरात जमलेल्या रकमेतून शिमगा आणि दिवाळी या सणाच्या वेळी मच्छीमाराला बोनस किंवा पोस्त दिले जायचे. चौथा वाटा पावसाळी म्हणून काढला जायचा. पावसाळ्यात ज्यावेळी मच्छीमारी बंद असायची, त्यावेळी वर्षभर जमलेल्या या रकमेतून त्यांना रोजगार (पगार) दिला जायचा आणि पाचवा वाटा उचल म्हणून काढला जायचा. त्या रकमेतून मच्छीमारांच्या अडचणीच्या प्रसंगी त्यांना तातडीची रक्कम उचल म्हणून अदा केली जायची. अशा प्रकारे लेबर अ‍ॅक्टचं काहीच प्रशिक्षण न घेतलेल्या जुन्या काळातील त्या रापण संघांनी आपली ‘कामगार कल्याण योजना’ उत्कृ ष्ट राबवली होती. लग्नाच्या वेळी वराला भरपगारी रजा म्हणजे त्याचा मासळीचा वाटा त्याला पोच. घरात कोणा व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर कार्य पूर्ण होईपर्यंत भरपगारी रजा. लग्नाच्या वेळी सर्व रापण संघांनी आपल्या संघातील नवऱ्या मुलाच्या अगर नव-या मुलीच्या मंडपापासून जेवणापर्यंतची सर्व व्यवस्था करणं ही कामगिरी बांधिलकीच्या नात्याने रापण संघ करायचा. त्यामुळे रापण कंपनी प्रत्येकालाच आपली वाटायची. त्यामुळेच कोकण किनारपट्टीचं ऐक्यही अबाधित राहिलेलं होतं. रापण संघात कोणी आजारी पडलं, तर सर्व खर्च रापण संघच करत असे. रापण संघात तंटाबखेडा अजिबात नव्हता. पूर्वीच्या रापणी नियोजनाविषयी सांगताना आचरे येथील दक्षिणवाडा रापण संघाचे 70 वर्षाचे सुरेंद्र टिकम यांनी एक वेगळीच माहिती दिली. ते म्हणाले, ‘रापण संघात हेवेदावे नसायचे. किनारपट्टीचा भाग ज्या ठ 0:300:30िकाणी कमी असेल आणि रापण संघाची संख्या जास्त असेल तेथे पालाव पद्धतीने रापणी मारण्यात यायच्या. म्हणजे रापणीच्या वेळा ठरवून दिलेल्या असायच्या. त्याचं कोणी उल्लंघन करत नसे. ज्या ठिकाणी कमी रापण संघ असायचे त्या ठिकाणी ‘जेची आग तेचो सोडो’ या पद्धतीने रापणी घालण्यात यायच्या. जेची आग याचा अर्थ मासळी शोधण्यासाठी प्रत्येक रापण संघाचा एक तज्ज्ञ जाणकार असायचा. तो समुद्रातून सुंभाचा ढलपा जाळून विशिष्ट खाणाखुणा करायचा. त्या खाणाखुणावरून कोणती मासळी आहे, हे समुद्रकिनाऱ्यावरच्या रापण संघाला समजायचं. ज्या रापण संघाच्या जाणकाराने अगोदर आग दाखवली असेल, त्या रापण संघांची रापण सोडली जायची. समुद्रकिनारी काही अपरिहार्य कारणासाठी मासेमारी बंद करायची असेल तर त्याला दुराई टाकणं असं म्हणत. काही जाणकार मच्छीमार समुद्राच्याकिनारपट्टीवरील हिरवीगार मर्यादावेल होडीच्या नाळी टाकत. ती सूचना सर्वजण आदेश मानून आपापल्या होडय़ांमध्येसुद्धा मर्यादावेल टाकत. यालाच दुराई टाकणं असं म्हणत. जोपर्यंत दुराई उठत नाही तोपर्यंत त्या किनारपट्टीवरील कोणीही मच्छीमार मच्छीमारीसाठी जात नसत. ही वर्दी ऐकूनही जर कोणी सभासद रापण ओढायला आला नाही तर शिक्षा म्हणून त्याच्या वाटय़ात कपातही व्हायची. त्या वर्दीला ‘पानसुपारी’ म्हणत. वर्दी म्हणजे कोणत्या वेळी रापण घालणार याची वेळ जाहीर करणं. त्यावेळी रापण संघात गुप्तता पाळली जायची. प्रत्येक रापण संघात दरवर्षी सत्यनारायणाची पूजा असायची. एखादवेळी जास्त मासळी मिळाली, तर समुद्रकिनाऱ्यावर ते जत्राही भरवत. दशावतारी खेळ करवत. स्वतंत्र बँडपथकं, कलापथकं स्थापन करत. पूर्वी काही ठिकाणी त्यांनी नारळीच्या बागाही उभ्या केल्या होत्या. ज्यावेळी धंदा बंद असेल त्यावेळी हे कल्पवृक्ष त्यांच्या मदतीला धावून जात असत. ग्रामदैवतेवर व कुलदैवतेवर त्यांचा खूप विश्वास असायचा. पूर्वी कोकण किनारपट्टीवर सर्व रापण संघांनी आपल्या अलिखित नियमांनी ही रापण संस्कृती जतन करून ठेवली होती. या रापण संस्कृतीमुळे जसं मस्त्यबीजाचं संरक्षण होत असे तसे मच्छीमारही सुरक्षित राहत असत. आज काळ बदललाय. ‘रापण म्हणजे काय रे भाऊ?’ असं विचारण्याची पाळी मच्छीमारांच्याही मुलांवर तर येणार नाही ना! अशी भीती वाटू लागली आहे. आज पात संस्कृतीत जखडलेल्या कोकणच्या सर्व श्रमिक मच्छीमारांनी या रापण संस्कृतीचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे. रापण संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचं संवर्धन करून ती जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. कष्टाच्या ऐनाचा आगूळ लावून तो अभेद्य केला पाहिजे. असं झालं तर अनेक सागरी संकटांना आमचे मच्छीमार.. एलाम्बे. हैले याल्लाऽऽऽ करून पळवून लावतील. भारत हा एक प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेला देश आहे. उत्तर भारतातील आर्यांच्या वास्तव्यामुळे यास आर्यावर्त म्हटले जाते. भरत राजाच्या आर्यांच्या शाखेमुळे भारतवर्ष नाव पडले तर वायव्येकडे वाहणा-या नदीस सिंधू नाव पडले. इरानी लोकानी सिंधू नदीचा उल्लेख हिंदू व भारताचा हिंदुस्थान असा केला- ग्रीक लोकांनी सिंधू नदीचा उल्लेख इन्डोस असा केला तर रुमानियन लोकांनी सिंधूस इंडस व भारतात इंडिया असे नाव दिले. भारताचे स्थान :- भारत पूर्व गोलार्धात मध्यवर्ती स्थानी आहे, तर दुस–या प्रकारे तो उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या प्रचंड आकारामुळे त्यास उपखंड म्हणतात. भारतीय उपखंडात भारत, मालदिव, पाकिस्थान भुतान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका यांचा समावेश होतो. भारताची मुख्य भुमी आशिया खंडाच्या दक्षिणेस ८०४ उ. ते ३७०६ उ. अक्षांश ६८०७ पू. ते ९७०२५ पू. रेखावृत्तापर्यंत पसरलेली आहे. भारताचे अति दक्षिणेचे टोक म्हणजे इंदिरा पॉइंट ( ग्रेट निकोबार ) ६०३० उत्तर अक्ष वृत्तावर आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते. ( गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, प. बंगाल, त्रिपूरा, व मिझोराम ) भारताचे दक्षिण टोक विषुववृत्तापासुन ८७५ कि.मी. अंतरावर आहे. भारताची पूर्व – पश्चिम लांबी २९३३ कि.मी. असून उत्तर दक्षिण लांबी ३२१४ कि.मी. इतकी आहे. भारताच्या सीमा व क्षेत्रफळ :- भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. भारताने जगाचे २.४२ % क्षेत्रफळ व्यापले आहे. जगातील सर्वात मोठे देश आकारानुसार १) रशिया २) कँनडा ३) चीन ४) अमेरिका ५) ब्राझील ६) ऑस्ट्रेलिया व ७) भारत भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी ६१०० कि.मी. आहे, तर एकूण समुद्री किनारपट्टीची लांबी ७५१६ कि.मी. आहे. भारताची जल सीमा किना–यापासुन १२ नॉटिकल मैल लांबी आहे. भारतात सर्वाधिक किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. यानंतर आंध्रप्रदेशाचा क्रमांक. ________________________________ Join us @MPSCGeography  ★|| eMPSCkatta ||★ भारतातील महत्त्वाचे रेल्‍वे समुद्री पूल 🚊  १) पंबन रेल्‍वे पूल :-  रामेश्‍वरमजवळ पंबन बेटापासून मुख्‍य किनारी येण 0:300:30्‍यासाठी बांधण्‍यात आलेला हा रेल्‍वे पूल आहे. १९११ साली याची सुरुवात झाली.  १४ फेब्रुवारी १९१४ साली हा लोकांसाठी खुला करण्‍यात आला.  पंबन रेल्‍वे पूल हा भारतामधील पहिला  समुद्री पूल आहे.  २०१० साली वांद्रे-वरळी सी-लिंकला सुरुवात होण्‍यापूर्वी हा भारतामधील सर्वात लांब समुद्री पूल होता.  काँक्रिट खांबाचा यात वापर करण्‍यात आला आहे.  दोन खांबामध्‍ये इतके अंतर ठेवण्‍यात आले आहे, की ज्‍याच्‍यामधून नौका आणि जहाजे जाऊ शकतील.  याला समांतर असा पूल बांधण्‍यात आला आहे. १९८८ साली लोकांसाठी हा रस्‍ता खुला करण्‍यात आला. ———————–  २) वांद्रे-वरळी सी लिंक :- वांद्रे-वरळी सी लिंकचे अधिकृत नाव राजीव गांधी सी लिंक असून दक्षिण मुंबईतील वरळी ते वांद्रे यांना जोडणारा हा पूल आहे.  यासाठी काँक्रिट स्‍टील मटेरियल वापरण्‍यात आले आहे.  नरीमन पॉईंटला जोडणाऱ्या फ्री वे चा हा एक भाग आहे.  या पुलासाठी १६०० कोटी इतका खर्च आला आहे. हिंदुस्‍तान कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनीने बांधलेला आणि महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाने  देखरेख केलेला हा पूल आहे.  ३० जून २००९ साली ८ पैकी ४ मार्ग खुले करण्‍यात आले.  २४ मार्च २०१० साली सर्व ८ मार्ग खुले केले गेले. वरळी आणि वांद्रे यांच्‍यातील अंतर कमी करण्‍यासाठी हा पूल बांधण्‍यात आला आहे. ———————– ३) कांडरौर पूल :- हिमाचल प्रदेश मधील बिलासपूर येथे सतलज नदीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे.  कांडरौर गावात हा पूल आहे.  कांडरौर पुलाची उंची ८० मी. इतकी आहे.  १९५९ साली याची सुरुवात झाली आहे आणि १९६४ साली हा खुला करण्‍यात आला.  पुलाची रुंदी ७ मीटर आहे. नदीच्‍या पात्रापासून ६० मीटर उंचीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. जगातील सर्वांत उंचीवर बांधण्‍यात आलेल्‍या पुलापैकी एक आणि आशियामधील सर्वांत उंच पूल अशी याची ख्‍याती आहे.  कांडरौर पूल हा हमीरपूर जिल्‍हा आणि बिलासपूर जि‍ल्‍हा यांना जोडतो. बिलासपूरपासून आठ कि.मी. अंतरावर राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ८८ वर आहे. ——————— ४) विद्यासागर सेतू :- विद्यासागर सेतूला दुसरा हुगळी पुल असेही म्‍हणता येईल.  पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा हा सेतू आहे.  या सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना टोल टॅक्‍स द्यावा लागतो, मात्र सायकलींना हा कर नाही.  विद्यासागर सेतू हा आशियाईतील सर्वांत लांब पुलांपैकी एक आहे. १९व्‍या शतकातील सुधारक ईश्‍वरचंद विद्यासागर यांचे नाव या सेतूला देण्‍यात आले आहे. हावडा पूल आणि विवेकानंद सेतू यासारखे अनेक समांतर पूल आहेत. या सेतूच्‍या कामाची सुरुवात १९७८ साली झाली आणि १० ऑक्‍टोबर १९९२ रोजी याचे उद्घाटन करण्‍यात आले. याची रुंदी ३५ मीटर असून, लांबी ४७५ मीटर इतकी आहे.  या सेतूचे बांधकाम विख्‍यात ब्रेथवेट बर्न आणि जेसेप किंवा बीबीजे यांनी केले आहे.  या सेतूवर १८२.८८ मीटर लांबीची समांतर केबल वायर जोडण्‍यात आली आहे. ______________________________________ आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा :@MPSCGeography______________________________________Telegram.me/MPSCGeography SAIMkatta: महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा- *देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर्वताच्या रांगा राज्याचा प्राकृतिक कणा असून उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा व पूर्वेस असलेल्या भामरागड-चिरोली-गायखुरी या डोंगररांगा राज्याच्या नैसर्गिक सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस गुजरात उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगढ, आग्नेयेस आंध्रप्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व नैऋृत्येस गोवा ही राज्ये आहेत.  *राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्‍या हिवाळ्यात टिकून राहते. *पश्‍चिम समुद्र तटावरून येणार्‍या पावसाळी ढगांमुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर 400 सेंमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. समुद्र किनारपट्टीवरील कोकणात मुसळधार पाऊस पडतो व तो उत्तरेकडे सकरताना कमी होत जातो. सह्याद्रीच्या पूर्वेला पश्‍चिम पठारावरील जिल्ह्यात 70सेंमी एवढा अत्यल्प पाऊस पडत असून सोलापूर व अहमदनगर हे सर्वाधिक कोरडे जिल्हे आहेत. पूर्वेस विदर्भ व मराठवाड्याकडे सरकताना पावसाचे प्रमाण काहीसे वाढते.  *लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसर्‍या क्रमांकाचे राज्य असून राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3.08 लक्ष चौ.कि.मी. आहे. जनगणना, 2011 नुसार राज्याची लोकसंख्या सुमारे 11.24 कोटी असून ती देशातील एकूण लोकसंख्येच्या 9.3 टक्के आहे. * राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून 45.2 टक्के लोकसंख्या ना 0:30TelegramMPSC GeographyHere u can get all useful info about Geography & Agri for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial @MPSCHRD @MPSCCsat

0:300:30गरी भागात राहते. राज्यात 36 जिल्हे असून प्रशासकीय सुविधेसाठी ते कोकण, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा महसुली विभागातविभागले आहेत. * जिल्हा स्तरावरील नियोजनासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. स्थानिक प्रशासनासाठी राज्याच्या ग्रामीण भागात 34 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या व 27,920 ग्रामपंचायती आहेत, तर नागरी भागात 26 महानगरपालिका, 230 नगरपरिषदा, 110 नगरपंचायती व सात कटक मंडळे आहेत. * मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असून बहुतांशी प्रमुख खाजगी कंपन्या व वित्तीय संस्थांची मुख्यालये या शहरात आहेत. देशातील प्रमुख वायदे व भांडवली बाजार आणि विक्रेय वस्तू व्यापार विनिमय केंद्रे मुंबईत आहेत. * राज्यातील 234 लाख हेक्टर जमीन लागवडीखाली तर 52.1 लाख हेक्टर वनांखाली आहे. सिंचनात वाढ व्हावी यासाठी अनेक सिंचन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. बिगर सिंचन क्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे गतीने होण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  *महाराष्ट्राला ‘2019 पर्यंत पाणी टंचाई मुक्त राज्य’ करण्याकरिता जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले असून याद्वारे दरवर्षी 5,000 गावे पाणी टंचाई मुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.  *पशुसंवर्धन हे कृषि क्षेत्राशी संबंधीत महत्त्वाचे क्षेत्र आहे. देशातील पशुधन व कुक्कुट पक्ष्यांच्या संख्येमध्ये राज्याचा हिस्सा अनुक्रमे 6.3 टक्के व 10.7 टक्के आहे. * महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे. लघु उद्योगात हे अग्रेसर असून देशांतर्गत तसेच विदेशी संस्थांकडून औद्योगि क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्याने सातत्य राखले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे हे प्रमुख केंद्र आहे. * जनगणना 2011 नुसार अखिल भारतीय स्तरावरील 73 टक्के साक्षरता दराच्या तुलनेत राज्याचा साक्षरता 82.3 टक्के आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिले जात असून राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या उत्कृष्ट संस्था आहेत.  *भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसारदेशाचा मानव विकास निर्देशांक 0.467 आहे तर राज्यासाठी तो 0.572 आहे. मानव विकास निर्देशांकात भारताचा सध्या 130 वा क्रमांकआहे.  *महिला धोरण राबविणारे तसेच महिलांच्या विकासासाठी ‘महिला व बालकल्याण’ या स्वतंत्र विभागाची स्थापना करुन अर्थसंकल्पीय तरतूद करणारे हे पहिले राज्य आहे. रोजगार हमी योजना राबविणारे हे आद्यप्रवर्तक राज्य असून केंद्र शासनाने ही येाजना अंगिकारली आहे.  *महाराष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमांनी रेखांकित केलेले राज्य नसून येथील जनतेने संघटितरित्या परिश्रमपूर्वक घटविलेले राज्य आहे. या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृती विकसित होण्यास नैसर्गिक तसेच सांस्कृतिक विविधता सहाय्यभूत झाली आहे. स्वतःची अध्यात्मिक बैठक असलेले हे राज्य ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते. *राज्याने देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावली आहे. अजंठा, वेरूळ व घारपुरीची लेणी, गेट वे ऑफ इंडिया आणि वास्तुशास्त्राच्या वैशिष्ट्यप ूर्ण वास्तू जसे विहार व चैत्य यामुळे जगभरातील पर्यटक राज्याकडे आकर्षित होतात. *मानव विकासास सहाय्यभूत ठरणार्‍या प्रत्येक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्तिमत्त्वे राज्यात उदयास आली आहेत. क्रीडा, कला, साहित्य व सामाजिक सेवा यामध्ये राज्याचे भरीव योगदान आहे. ‘बॉलीवूड’ नावाने जगप्रसिद्ध असलेला चित्रपट उद्योग राज्यात स्थित आहे. ——————————————– Join us @MPSCGeography नदियों के किनारे बसे भारत के प्रमुख नगर- 1.आगरा – यमुना – उत्तर प्रदेश 2.अहमदाबाद – साबरमती – गुजरात 3.इलाहाबाद – गंगा – उत्तर प्रदेश 4.अयोध्या – सरयू – उत्तर प्रदेश 5.बद्रीनाथ – गंगा – उत्तराखंड 6.कोलकाता – हुगली – पश्चिम बंगाल 7.कटक – महानदी – ओडिशा 8.नई दिल्ली – यमुना – दिल्ली 9.डिब्रूगढ़ – ब्रह्मपुत्र – असम 10.फिरोजपुर – सतलज – पंजाब 11.गुवाहाटी – ब्रह्मपुत्र – असम 12.हरिद्वार – गंगा – उत्तराखंड 13.हैदराबाद – मूसी – तेलंगाना 14.जबलपुर – नर्मदा – मध्य प्रदेश 15.कानपुर – गंगा – उत्तर प्रदेश 16.कोटा – चंबल – राजस्थान 17.जौनपुर – गोमती – उत्तर प्रदेश 18.पटना – गंगा – बिहार 19.राजमुंदरी – गोदावरी – आंध्र-प्रदेश 20.श्रीनगर – झेलम – जम्मू और कश्मीर 21.सूरत – ताप्ती – गुजरात 22.तिरूचिरापल्ली – कावेरी – तमिलनाडु 23.वाराणसी – गंगा – उत्तर प्रदेश 24.विजयवाडा – कृष्णा – आंध्र प्रदेश 25.वडोदरा विश्वमित्री गुजरात 26.मथुरा – यमुना – उत्तर प्रदेश 27.औरैया – यमुना – उत्तर प्रदेश 28.इटावा – यमुना – उत्तर प्रदेश 29.बंगलौर – वृषभावती – कर्नाटक 30.फर्रुखाबाद – गंगा – उत्तर प्रदेश 31.फतेहगढ़ – गंगा – उत्तर प्रदेश 32.कन्नौज – गंगा – उत्तर प्रदेश 33.मंगलौर – नेत्रवत 0:300:30ंतर सोलापूर जिल्ह्यातील म्हैसगावपासून हिचा प्रवाह याच जिल्ह्यातून पुढे वाहत जातो. कर्नाटक राज्य आणि सोलापूर जिल्हा यांच्या सरहद्दीवर कुडल गावाजवळ ही नदी भीमा नदीस मिळते. सीना नदीचे पात्र उथळ असून उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ते कोरडे पडते. मेहेक्री ही सीना नदीची प्रमुख उपनदी असून ती बीड जिल्ह्यामध्ये सांगवीजवळ सीना नदीला डावीकडून मिळते. याशिवाय तलवार, इंचाना, कामुही, भेंडी, नल्की, चांदली इ. तिच्या उपनद्या आहेत. सीना-निमगाव व सीना-कोळेगाव हे या नदीवरील प्रकल्प असून, सीना-कोळेगाव योजनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सु. ९,३०० हे. क्षेत्र ओलिताखाली आले आहे. चोंडी ( अहमदनगर जिल्हा ), मोहोळ, वडवळ, कुडल (सोलापूर जिल्हा) इ. या नदीवरील महत्त्वाची ठिकाणे आहेत. ———————————————- जॉईन करा @MPSCGeography 🔹कुंदा नदी : निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थिमुंड इ. शिखरांच्या १,७०० मी. पेक्षा अधिक उंचीच्या पर्वतप्रदेशात उगम पावणाऱ्या अ‍ॅवलांच व एमेरल्ड या प्रवाहांनी मिळून कुंदा नदी झालेली आहे. तिच्या व दक्षिणेकडील अपर भवानीच्या कुंदा नदीप्रकल्प खोऱ्यादरम्यान निलगिरी पठाराच्या नैर्ऋत्येस कुंदा पर्वतरांग आहे. तिच्यात अ‍ॅवलांच, बेअरहिल, माकुर्ती ही २,५०० मी. हून अधिक उंचीची शिखरे असून, त्या भागात नैर्ऋत्य व ईशान्य मान्सूनचा पाऊस दरवर्षी सु. ४०० सेंमी. पडतो. ते पाणी भवानीला आणि कुंदेला मिळते. सिल्लाहल्ला, कनारहल्ला, पेंगुबहल्ला इ. उपनद्यांचे पाणी घेऊन कुंदा अपर भवानीला मिळते. या दोन्ही नद्या मग भवानी या नावाने कावेरीला मिळतात. निलगिरीच्या उभ्या उतारांवरून कुंदा वेगाने खाली येते. मंडनायूजवळ तिला सु. ६६ मी. उंचीचा एक धबधबा आहे. कुंदेच्या परिसरातील वनश्री अत्यंत नयनरम्य आहे. कुंदेचे पाणी आणि तिचा वेग व शक्ती यांचा उपयोग करून कुंदा योजना किंवा लोअर भवानी योजना १९५६ मध्ये सुरू झाली. या योजनेत लहानमोठी बारा धरणे, यांना जोडणारे सु. ४० किमी. लांबीचे बोगदे, विद्युत्‌गृहे, कालवे इ. असून, चौथ्या पंचवार्षिक योजनेअखेर ११० मेगॅवॉट वीज उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. पूरनियंत्रण, ७९,००० हे. शेतीला पाणीपुरवठा तसेच अ‍ॅल्युमिनियम, कॉस्टिक सोडा, सिमेंट, कागद इ. उद्योगांना आणि शेकडो खेड्यांना घरगुती वापरासाठी व छोट्या उद्योगधंद्यांसाठी वीजपुरवठा, हे या योजनेचे उद्देश असून, कोलंबो योजनेनुसार या प्रकल्पासाठी कॅनडाचे मोठे साहाय्य झालेले आहे. —————————————— जॉईन करा @MPSCGeography0:300:30🔹महीनदी : (माही नदी). मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात या तीन राज्यांतून वाहणारी नदी. मही नदीची लांबी ५३३ किमी. असून मध्य प्रदेश राज्याच्या धार जिल्ह्यात विंध्य पर्वतात ६१७ मी. उंचीवर ती उगम पावते. या राज्यातून वायव्य दिशेने ती १६० किमी. अंतर वाहत जाते. पुढे राजस्थान राज्यातील डूंगरपूर या जिल्ह्याच्या उत्तरेकडील मेवाड टेकड्यांमुळे ती नैर्ऋत्यवाहिनी होऊन डूंगरपूर व बांसवाडा या जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहत जाऊन गुजरात राज्याच्या गोध्रा जिल्ह्यात प्रवेशते व पुढे खंबायतच्या आखाताला मिळते. या नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र ३४,८४२ चौ. किमी. आहे. डाव्या तीरावरील अनास व पानम आणि उजव्या तीरावरील सोम या तिच्या प्रमुख उपनद्या होत. उधानाच्या भरतीच्या वेळी मही नदीमुखातून आत सु. ३२ किमी. पर्यंत पाणी येते. पूर्वीपासून महापूर, खोल दऱ्या व उंच काठ यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मही नदीवरील जलसिंचन प्रकल्पांमुळे तिला महत्त्व प्राप्त झाले असून राजस्थान व गुजरात राज्यांतील शेतीच्या दृष्टीने ती जास्त उपयुक्त ठरली आहे. गुजरात राज्यात या नदीवर ‘मही प्रकल्प’ ही दोन टप्प्यांची योजना असून पहिल्या टप्प्यात वनकबोरी गावजवळ ७९६ मी. लांब व २०·६ मी. उंचीचा चिरेबंदी बंधारा बांधण्याची योजना आहे. याच्या उजव्या कालव्यामुळे (७४ किमी. लांब) सु. १·८६ लक्ष हे. जमिनीस पाणीपुरवठा होईल. दुसऱ्या टप्यात कडाणाजवळ १,४३० मी. लांब व ५८ मी. उंचीचे माती-काँक्रीटचे संयुक्त धरण बांधलेले असून त्यामुळे ८९,००० हे. क्षेत्रास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. यांशिवाय राजस्थान राज्यातील या नदीवरील प्रकल्पांमुळेही त्या राज्याला जलसिंचनाचा लाभ मिळाला आहे. मही नदीचा उल्लेख महाभारतात व पुराणांतही आढळतो. पुराणांत तिला ‘मनोरमा’ असे म्हटले आहे. गुजरात राज्यात मही नदीच्या काठावर नवनाथ, ८४ सिद्ध व इतर देवता यांची मंदिरे आहेत. मिंग्रड, फाझिलपूर, अंगद, मसपूर ही कोळी लोकांची पवित्र स्थळे मही नदीच्या काठावरच आहेत. ‘महिसागर संगम’ या नावाने ओळखले जाणारे खंबायतच्या आखातातील या नदीचे मुख हे पवित्र तीर्थक्षेत्र मानेल जाते. —————————————— जॉईन करा @MPSCGeography 🔹भवानी नदी : द. भारतातील कावेरी नदीची प्रमुख उपनदी. ही केरळ राज्यातील पालघाट (पालक्काड) जिल्ह्याच्या वेल्लुवनाड तालुक्यात, साइलेंट व्हॅलीच्या जंगल भागात उगम पावते. या पूर्ववाहिनी नदीची लांबी सु. १६९ किमी. आहे. ही नदी पुढे तमिळनाडू राज्याच्या कोईमतूर जिल्ह्यात प्रवेश करीत पूर्व दिशेने वाहत जाऊन भवानी गावाजवळ कावेरी नदीस मिळते. धन्यकोट्टैजवळ मिळणारी मोयार ही भवानी नदीची प्रमुख उपनदी असून कोरंगपल्लम्, कुंदा, पेरिङ्‌गपलम्, सिरुवनी, कूनूर या अन्य नद्याही तिला मिळतात. नैऋत्य मोसमी पर्जन्यकाळात या नदीस मोठे पूरही येतात. जलसिंचनाच्या दृष्टीने भवानी नदीस महत्त्व आहे. या नदीवर मोयार नदी-संगमाच्या खालील बाजूस सु.२ किमी. व सत्यमंगलमपासून सु. ७ किमी. अंतरावर लोअर भवानी प्रकल्पातील धरण बांधण्यात आले आहे. या धरणापासून ८३,८७० हे. क्षेत्रास पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे कोईमतूर जिल्ह्यात कापूस व अन्नधान्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य झाले आहे. —————————————– जॉईन करा @MPSCGeography 🔹काटेपूर्णा नदी : अकोला जिल्हयाच्या मध्य भागातून वाहणारी पूर्णा नदीची उत्तरवाहिनी उपनदी. लांबी सु.९७किमी.; नदीखोऱ्याचे क्षेत्रफळ १,१६० चौ.किमी. ही वाशिम तालुक्यातील काटा या गावाजवळ अजिंठ्याच्या पर्वतराजीत उगम पावून मंगरुळ, अकोला आणि मुर्तिजापूर या तालुक्यांतून वाहत जाऊन भटोरी गावाजवळ पूर्णेस मिळते. अकोल्यापासून आग्नेयीकडे ३५ किमी. वरील वास्तापूर या गावानजीक या नदीवर मातीचे धरण बांधून अंदाजे २४,००० हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलत करण्याची योजना आहे. ————————————– जॉईन करा @MPSCGeography 🔹मांजरा नदी : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. सुमारे ६१६ किमी. लांबीची ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. सुरुवातीच्या भागात ही पूर्ववाहिनी असून बीड-उस्मानाबाद तसेच बीड-लातूर या जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. कासारखेडजवळ ही नदी लातूर जिल्ह्यात प्रवेश करते व जिल्ह्याच्या माध्यातून आग्नेयीस वाहत जाऊन निलंगा गावाजवळ कर्नाटक राज्यात व पुढे बीदरच्या पूर्वेस आंध्र प्रदेश राज्यात जाते. आंध्र प्रदेशातील संगरेड्डीपेटजवळ मांजरा नदी एकदम वळण घेऊन वायव्य दिशेने वाहू लागते. निझामाबाद जिल्ह्यात या नदीवर धरण बांधण्यात आले असून (१९३१) प्रसिद्ध निझामसागर तलाव तयार करण्यात आला आहे. पुढे ही नदी पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सरहद्दीपर्यंत येऊन नांदेड जिल्ह् 0:300:30यातील शेळगावपासून ईशान्येस, राज्याच्या सरहद्दीवरून वाहत जाते व याच जिल्ह्यातील कुंडलवाडी गावाजवळ गोदावरी नदीस उजवीकडे मिळते. तेरणा, कारंजा, तावरजा, लेंडी व मन्याड या मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. या नदीस तेरणा नदी लातूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर निलंग्याच्या पूर्वेस, तर कारंजा नदी आंध्र प्रदेश राज्यात मिळते, लेंडी व मन्याड या नद्या नांदेड जिल्ह्याच्या सरहद्दीवर या नदीला डावीकडून मिळतात. मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी केला जातो. नदीखोरे सुपीक असल्याने येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या नदीच्या वरच्या खोऱ्यात मुख्यत्वे कापसाचे पीक घेतले जाते, तर खालच्या खोऱ्यात ज्वारी, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन होते. बहुतेक ठिकाणी नदीकाठ मंद उताराचे असल्याने या नदीचा फेरी वाहतुकीसाठीही थोड्याफार प्रमाणात उपयोग होतो. ———————————— जॉईन करा t.me/mpscgeography 🔹वारणा नदी : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते. ती कृष्णा नदीस सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सु. दीड किमी. अंतरावर सस. पासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मी. रुंद आहे. काडवी व मोरणा या वारणेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सु. ७०० मी. उंचीच्या प्रदेशात होतो. सुमारे ३५.४ किमी. वाहून काडवी नदी सागावजवळ वारणा नदीस मिळते. काडवी नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह बराच विस्तारित होतो. काडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे काडवी नदीस मिळतात. सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयीस वाहते. या नदीची लांबी सु. २७.३५ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आढळतात. शिराळा तालुक्यातील मांगळे गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन पन्हाळा तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत. वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत झाला असून त्याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १६०४७’ उ. ते १७०१५’ उ. आणि ७३०३०’ १५” पू. ते ७४०३०’ पू. यांदरम्यान आहे. या खोऱ्याची लांबी १४९ किमी., सरासरी रुंदी २१ किमी. व एकूण क्षेत्र २,०९५ चौ. किमी. आहे. वारणा खोऱ्यात शिराळा, वाळवा, मिरज (जि. सांगली), शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ (जि. कोल्हापूर), पाटण (जि.सातारा) या आठ तालुक्यांचा समावेश होतो. भूवैज्ञानिक दृष्ट्या वारणा खोरे दख्खन ढाली प्रदेशात वायव्य भागात येते. वारणा नदीच्या खोऱ्यात विविध प्रकारची भूरूपे असल्याने येथील स्थलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. पश्चिमेकडे कोकण व पूर्वेकडे दख्खन पठार यांदरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात वारणा खोरे असल्याने दोन्ही प्राकृतिक विभागांतील गुणधर्म वारणेच्या खोऱ्यात आढळतात. खोऱ्यातील पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशापेक्षा जास्त उंचसखल आहे. वारणेचे खोरे पश्चिम घाटामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे पाऊस कमी पडतो. मॉन्सून काळात पाऊस पडतो, परंतु इतर कालावधी कोरडा असल्याने वारणेच्या खोऱ्यातील नद्यांना पावसाळा वगळता इतर काळात पाणी फारच कमी असते. वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात. शाहूवाडी तालुक्यात आंबोळी येथे वारणा नदीवर एक मोठा प्रकल्प आणि सांगली जिल्ह्यात चांदोली व शिराळा तालुक्यात वारणा पाटबंधारे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोरणा नदीवर शिराळा तालुक्यातील प्रकल्प, तर शाहूवाडी तालुक्यात पोटफुगी नदीवर काडवी प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे. यांशिवाय वारणेच्या खोऱ्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व काही लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तसेच वारणानगर (कोडोली) सारखी गावे उद्योगधंद्यांमुळे विकास पावली आहेत. या खोऱ्यातील खेड्यांना जोडणारे अनेक पक्के रस्ते, जिल्हा प्रमुख रस्ते व ग्रामीण रस्ते आहेत. परंतु या खोऱ्यात लोहमार्ग व हवाई वाहतूक यांची सोय नाही. कोल्हापूर, मिरज, सांगली ही या खोऱ्यातील लोकांना जवळची रेल्वेस्थानके आहेत. ———————————————- Join us @MPSCGeography 🔹माण नदी : महाराष्ट्र राज्यातील भीमा नदीची उजव्या तीरावरील प्रमुख उपनदी. आंधळी धरणाच्या योजनेमुळे हिला महत्त्व प्राप्त झाले असून नदीची लांबी सु. १६० किमी., पैकी सोलापूर जिल्ह्यातील लांबी सु. ८० किमी. आहे. सा 0:30TelegramMPSC GeographyHere u can get all useful info about Geography & Agri for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial @MPSCHRD @MPSCCsat

0:300:30तारा जिल्ह्याच्या माण तालुक्यात, फलटणजवळच्या डोंगरात हिचा उगम होतो. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातून आग्नेय दिशेस वाहत जाऊन पुढे ती सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यात प्रवेश करते. सांगली जिल्हाच्या उत्तर भागातून आग्नेय दिशेने थोडे अंतर वहात गेल्यावर ती सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात प्रवेशते. सांगोला तालुक्यातून प्रथम पूर्वेस व नंतर ईशान्येस वाहत जाते. पुढे काही अंतर पंढरपूर-मंगळवेढे तालुक्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन पंढरपूरच्या आग्नेयीस १७ किमी. वर असलेल्या सरकोलीजवळ भीमेला मिळते. नदीचे काठ सपाट व कृषियोग्य असून नदीपात्रात रेती आढळते. बेलवण, खुर्डू, सानगंगा व वांकडी हे प्रवाह माण नदीला मिळत असून ते कोरड्या ऋतूत पूर्ण आटतात. माण तालुक्यातील बोडके गावाजवळ या नदीवर आंधळी धरण बांधावयाची योजना आज अनेक वर्षे रेंगाळत आहे. दहिवडी, म्हसवड, दिघंची, सांगोला ही माण नदीकाठीवरील प्रमुख गावे आहेत. ————————————————- Join us @MPSCGeography 🔹सुरमा नदी : भारत व बांगला देशातून वाहणारी व मेघना नदीचा शीर्षप्रवाह असलेली एक नदी. लांबी सु. ९०२ किमी. मणिपूर टेकड्यांमध्ये माओसोंगसंगच्या दक्षिणेस २५० २८’ उत्तर अक्षांश व ९४० १८’ पूर्व रेखांश यांदरम्यान या नदीचा उगम आहे. ही नदी उत्तर मणिपूर टेकड्यांमधून पश्चिमेकडे वाहत जाऊन मणिपूर राज्याच्या पश्चिम सीमेवर तिपाईमुख येथे उत्तराभिमुख होऊन आसाम राज्यात प्रवेश करते व काचार भागातून वेड्यावाकड्या वळणांनी सुरमा खोऱ्यातून पश्चिमेकडे वाहत जाते. सुरमा खोऱ्यात सिद्घेश्वर (सारसपूर) टेकड्या असून त्यांची सस.पासूनची उंची १८३ मी. ते ६१० मी. दरम्यान आहे. काचारच्या पश्चिम सरहद्दीजवळ सुरमा दोन शाखांत विभागली गेली आहे. तिची दक्षिण शाखा प्रथम कुशियारा नावाने प्रसिद्घ आहे. पुढे तिचे पुन्हा दोन फाटे बराक व बिबियाना नावांनी बांगला देशातून वाहतात. हे पुढे सुरमा नदीच्या उत्तर प्रवाहास मिळतात. सुरमा नदीचा विभागलेला उत्तरेकडील दुसरा प्रवाह सुरमा नावाने खासी टेकड्यांमधून बांगला देशातील सिल्हेट व चाटाक शहरांतून वाहत जातो व सुनामगंजजवळ एकदम दक्षिणेस वाहत जाऊन पुढे ब्रह्मपुत्रेच्या जुन्या प्रवाहास भैरब बाझार येथे मिळतो. तद्नंतरचा हा संयुक्त प्रवाह मेघना नदी या नावाने ओळखला जातो. सुरमा नदीस उत्तरेकडून जिरी, जटिंगा, बोगापानी, जादूकता, तर दक्षिणेकडून सोनाई, ढालेश्वरी, सिंग्ला, लोंगाई, मनू, खोवाई या महत्त्वाच्या उपनद्या येऊन मिळतात. वरच्या भागात नदी दऱ्याखोऱ्यांतून वाहते. त्यामुळे पुराचे पाणी लगतच्या प्रदेशात क्वचितच पसरते; मात्र हिचा खालचा भाग त्यामानाने उथळ असल्याने पुराचे वेळी पाणी लगतच्या भागात पसरुन काही प्रमाणात नुकसान होते. सुरमा नदीस दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्व असून आसाम-बंगाल लोहमार्ग होण्यापूर्वी या नदीतून जलवाहतूक होत असे. त्या वेळी ती या भागातील दळणवळणाचा प्रमुख मार्ग होती. तुडुंबी, कारग, तिपाईमुख, सिल्वर, बदरपूर, करीमगंज, सिल्हेट, मनुमुख, हबीगंज, बालागंज, सुनामगंज इत्यादी सुरमा नदीकाठावरील काही प्रमुख शहरे होत. ————————————— Join us @MPSCGeography 🔹शिवालिक नदी : उत्तर भारतातील जलोत्सारण प्रणालीच्या (नदीनाल्यांच्या) रचनेत अनेक मोठे बदल तृतीय कल्पानंतर (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळानंतर) घडून आले. यामुळे तेथील मोठ्या नद्या अगदी उलट दिशेने वाहू लागल्या. हिमालयाच्या पायथ्याशी ⇨ शिवालिक संघाच्या खडकांचा लांब पातळ पट्टा तयार होऊन तो पश्चिमेकडे अधिक रुंद झाला. हे खडक वायव्येकडे वाहणाऱ्या एका मोठ्या नदीच्या पूरभूमीत साचलेले आहेत, असे मानतात. आसाम (पोटवार पठाराच्या पूर्वेकडील ब्रह्मपुत्रा खोरे) ते पंजाबच्या सर्वांत वायव्येकडील कोपऱ्यापर्यंत (पाकिस्तानातील बन्नू मैदानापर्यंत) ही नदी वाहत होती. या बन्नू मैदानात ती दक्षिणेकडे वळून सावकाशपणे आटत असलेल्या मायोसीन (सु. २ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील समुद्राला मिळाली होती. जी. ई. पिलग्रिम यांनी गंगा व यमुना नद्यांच्या दरम्यान असलेल्या शिवालिक टेकड्यांवरून या नदीला शिवालिक नदी हे नाव दिले, तर ई. एच्. पॅस्को यांनी सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या एकत्रित प्रवाहावरून हिचे इंडोब्राह्म असे नामकरण केले. हिमालयाच्या मुख्य उत्थानानंतर समुद्राच्या अवशिष्ट अरुंद पट्ट्यांतून ही नदी निर्माण झाली, असे मानतात. या नदीच्या त्रिभूज प्रदेशाच्या आक्रमणाने समुद्राचा हा पट्टा सावकाशपणे मागे हटत गेला. येथील विस्तृत द्रोणीत मुरी शिवालिक निक्षेपांचे जाड थर साचले. शिवालिक संघाच्या काळानंतर (सु. १·२ कोटी वर्षांपूर्वी) वायव्य पंजाबात भूकवचात झालेल्या हालचालींनी ही जलोत्सारण प्रणाली भंग पावून सिंधू, तिच्या पाच उपनद्या, गंगा व तिच्या उपनद्या या तीन जलोत्सारण उपप्रणाल्या निर्माण झाल्या. सुमारे १·२ कोटी ते ६ लाख 0:300:30

वर्षांपूर्वीच्या प्लाइस्टोसीन हिमयुगात शिवालिक नदी नाहीशी झाली. वायव्य आसामात आढळलेल्या नदीमुखामुळे बंगाल-आसाममधील शिवालिक नदीच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली जाते. शिवालिक नदीत प्रवेश करणाऱ्या हिमनद्यांमार्फत पंजाबातील पाहुणे पाषाण त्यांच्या सध्याच्या ठिकाणी वाहून आले असल्याचे ए. एल्. कूलसन यांचे मत आहे. ——-–—————————————— Join us @MPSCGeography 🔹दामोदर नदी : बिहार आणि प. बंगाल राज्यांतील खनिजसमृद्ध प्रदेशातून वाहणारी गंगेची उपनदी. लांबी सु. ६२५ किमी. जलवाहनक्षेत्र २०,७०० चौ.किमी. ही छोटा नागपूर पठारातील रांची पठारावर पालामाऊ जिल्ह्याच्या तोरी परगण्यात रांचीपासून ५६ किमी., रांची–लोहारडागा रस्त्यावरील कुरू गावाच्या पूर्व ईशान्येस १६ किमी. वर, समुद्रसपाटीपासून सु. ६१० मी. उंचीवर उगम पावते. तिचा दुसरा उगमप्रवाह हजारीबाग जिल्ह्यातील तोरी–समारिया रस्त्यावरील बालुमाथ गावाच्या दक्षिणेस सु. ३ किमी. वरून निघून पहिल्या मुख्य प्रवाहाला सु. २० किमी. वर मिळतो. सुरुवातीला दामोदर सु. ४२ किमी. डोंगराळ भागातून वाहते. नंतर ती पठारावरील विभंगद्रोणीतून करणपुरा व रामगढ कोळसाक्षेत्रांतून सु. ७५ किमी. पूर्वेकडे गेल्यावर ईशान्येस सु. २३ किमी. जाते व पुन्हा सामान्यतः पूर्वेकडे वाहू लागते. बोकारो कोळसाक्षेत्रातून आलेली गोमिया व उत्तरेकडून आलेली कोनार यांचा संयुक्त प्रवाह तिला गोमिया व बेर्मो यांदरम्यान मिळतो. जमुनिया व इतरही अनेक प्रवाह तिला दोन्ही बाजूंनी येऊन मिळतात. धनबाद जिल्ह्यातील झरिया कोळसाक्षेत्रातून गेल्यावर राणीगंज कोळसाक्षेत्राच्या पश्चिम भागात तिला तिची उत्तरेकडील सर्वांत महत्त्वाची व मोठी उपनदी बराकर मिळते. येथून ती आग्नेय वाहिनी होऊन प. बंगाल राज्यात शिरते. येथून ती नौसुलबही होते. बरद्वानजवळून गेल्यावर सु. २० किमी. वर ती एकदम दक्षिण वाहिनी होते. नंतर बरद्वान व हुगळी जिल्ह्यांतून जाऊन ती कलकत्त्याच्या नैर्ऋत्येस ५६ किमी. वरील फाल्टा येथे हुगळी या गंगेच्या फाट्यास मिळते. सुरुवातीच्या सु. २०० किमी. भागात नदीप्रवाहाचा उतार दर किमी.ला १·९ मी., नंतरच्या सु. १६० किमी. भागात दर किमी.ला ०·५७ मी. व अखेरच्या सु. १५० किमी. भागात तो दर किमी.ला फक्त ०·१९ मी. आहे. यामुळे सुरुवातीच्या भागात दामोदर वेगाने वाहते आणि पठाराची झीज करून पुष्कळच दगडमाती आपल्या प्रवाहाबरोबर वाहून नेते. पुढे वेग कमी झाल्यावर पात्रात व आजूबाजूला गाळ साचू लागतो. बरद्वानच्या आधीच्या सु. १०० किमी. भागात नदीच्या पात्रात ठिकठिकाणी वाळू साचते व प्रवाहाला त्यातून मार्ग काढावा लागतो. अखेरच्या भागात प्रदेश इतका सपाट आहे की, प्रवाहाला फाटे फुटून त्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेशाचे स्वरूप येते. दामोदरचे वैशिष्ट्य म्हणजे तिला येणारे विनाशकारी पूर. दामोदरच्या खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी तिच्यातून व तिच्या उपनद्यांतून जलाभेद्य स्फटिकी खडकांवरून येते व त्यामुळे पावसाळ्यात नद्या खूपच फुगतात. हे सर्व पाणी आसनसोलजवळच्या निरुंद भागातून पुढे जाते व बरद्वान आणि हुगळी जिल्ह्यांच्या सपाट प्रदेशात एकदम पसरते. या प्रदेशाचे अशा पुरांमुळे फारच नुकसान होत आले आहे. जंगलतोड व भूपृष्ठाची झीज यांमुळे हे पूर अधिकच विध्वंसक ठरले आहेत. काही वेळा दामोदरच्या पुराचे पाणी दक्षिणेकडे पसरून रूपनारायण नदीलाही मिळते. पूर्वी दामोदर कलकत्त्याच्या वरच्या बाजूस सु. ६२ किमी. वर नया सराई येथे हुगळीला मिळत असे. परंतु अठराव्या शतकात पुराचे पाणी व नदीचे पात्र दक्षिणेकडे सरकू लागले. १७७० मध्ये पुरामुळे बरद्वान शहर पार उद्ध्व‌स्त झाले. नदीकाठचे बांध मोडून गेले व मोठा दुष्काळ पडला. पुढे एकोणिसाव्या शतकातही पुरांमुळे अनेक वेळा नुकसान झाले. चालू विसाव्या शतकात भारत स्वतंत्र झाल्यावर या पुरांचे नियंत्रण करण्यासाठी व वीजउत्पादन, वाहतूक इ. इतर हेतूंसाठी दामोदर खोरे निगमाची स्थापना होऊन बहूउद्देशीय योजना कार्यान्वित झाली. दामोदर व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांतून लोहमार्ग व सडका यांना सुलभ मार्ग उपलब्ध झाले आहेत. दामोदर व तिच्या दक्षिणेची कासई या नद्यांदरम्यानचा भूप्रदेश संथाळ लोकांची पवित्र भूमी होय. ते दामोदरला समुद्रच मानतात आणि त्यांच्या मृतांच्या शरीराचा काही जळका भाग त्या नदीत टाकल्यावरच त्याचे और्ध्वदेहिक पुरे होते. तो भाग पुढे महासागरात जातो असे ते मानतात. दामोदर खोऱ्याच्या विकास योजनेमुळे तो प्रदेश भारतातील एक अग्रेसर औद्योगिक विभाग बनला आहे. तेथील लोकवस्ती फार दाट (दर चौ.किमी. स ३८४ लोक) आहे. दामोदर खोऱ्याची भौगोलिक रचना : दामोदर खोऱ्यात अनेक उंचसखल भाग समाविष्ट आहेत. हजारीबाग आणि गया जिल्ह्यांत सु. ३८० मी. उंचीचे कोडार्मा पठार असून ते गिरिदिहकडे विस्तारले आहे. या पठारावर दामोदरची प्रमुख उपनदी बराकर उगम पावते. हजारीबाग पठाराच्या ईशान्य कोपऱ्यात १,३६५·५ मी. उंचीचा पारसनाथचा डोंगर आहे. स 0:300:30

About Prithviraj Gaikwad

Check Also

चालू घडामोडी प्रश्नसंच व उत्तरे-3 (स्पष्टीकरणासहित)

चालू घडामोडी प्रश्नसंच व उत्तरे-3 (स्पष्टीकरणासहित)-चालू घडामोडी प्रश्नसंच व उत्तरे,current affairs questionset-3(with explanation),chalu ghadamodi prashnasanch-3(spashtikrnasahit) …

चालू घडामोडी प्रश्नसंच व उत्तरे-2 (स्पष्टीकरणासहित)

चालू घडामोडी प्रश्नसंच व उत्तरे-2 (स्पष्टीकरणासहित)-2021-22, Current Affairs Question and Answer with Solutions2021-22, chalu ghadamodi …

चालू घडामोडी प्रश्नसंच व उत्तरे-1 (स्पष्टीकरणासहित)

चालू घडामोडी प्रश्नसंच व उत्तरे-1 (स्पष्टीकरणासाहित), Current Affairs Question and Answer with Solutions, chalu ghadamodi …

Contact Us / Leave a Reply