PSI/STI/ASO Combine Test No. 06, combine tes series, combine mock test online.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.

PSI/STI/ASO Combine Test No. 06
26) खाली विधानांचा विचार करा.
अ) डेंग्यू या रोगात रक्तपट्टीकांचे प्रमाण कमी होते.
ब) नाकातून व हिरड्यातून रक्त येणे, हे डेंग्यूचे लक्षण आहे.
1) ‘अ’ व ‘ब’ विधान बरोबर, ‘ब’ हे ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
2) ‘अ’ व ‘ब’ विधान बरोबर, ‘अ’ हे ‘ब’ चे स्पष्टीकरण नाही.
3) ‘अ’ बरोबर, ‘ब’ चूक
4) दोन्ही चूक
उत्तर :2) ‘अ’ व ‘ब’ विधान बरोबर, ‘अ’ हे ‘ब’ चे स्पष्टीकरण नाही.
स्पष्टीकरण :
डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर 5-6 दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. ह्या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. भारतात 1963 साली कलकत्त्यात डेंगीची पहिली मोठी साथ आली. त्यानंतर बहुतांश महानगरे, शहरे व ग्रामीण भागांमधेही डेंग्यूचा उद्रेक झाल्याची वृत्ते येऊ लागली. डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ) हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव – चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्राव, अंतर्गत रक्तस्राव-आंतड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेट्सची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच असतात. तीव्र, सतत पोटदुखी, त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे, नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे, रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे, झोप येणे आणि अस्वस्थता, रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते, नाडी कमकुवतपणे जलद चालते, श्वास घेताना त्रास होणे, इ. लक्षणे आहेत.
27) स्थानिक स्वराज्य संस्थांतील महिला सदस्यांचे सक्षमीकरण करून आदर्श व्यक्तिमत्त्व घडविणे आणि निवडणुकांतील महिला उमेदवारांमध्ये आत्मविश्वासाचे प्रेरणास्त्रोत निर्माण करण्यास राज्य निवडणूक आयोगामार्फत कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला ?
अ) राजमाता प्रकल्प ब) क्रांतीज्योती प्रकल्प
क) समता प्रकल्प ड) सबला प्रकल्प
वरील कोणते विधाने चूक आहेत ?
1) अ व ब 2) फक्त ब
3) फक्त अ 4) वरील सर्व
उत्तर : 2) फक्त ब
स्पष्टीकरण :
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना कायद्याने अर्धे राज्य मिळाले पण, महिला लोकप्रतिनिधी नामधारी व सत्ता पती, मुलगा वा सासऱ्यांच्या हातात, ही रबर स्टँप प्रतिमा बदलण्यासाठी राज्य निवडणूक आयोग पुढे सरसावला आहे. महिलांमधील निर्णय क्षमता वाढावी, सामाजिक, राजकीय प्रगल्भ व्हावे म्हणून क्रांतीज्योती हा प्रकल्प सुरू होत आहे. ग्रामपंचायत सदस्यांपासून या प्रकल्पाची सुरुवात होणार असून 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प राबवण्यात येईल. सुमारे 25 हजार महिला लोकप्रतिनिधींच्या सक्षमीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायत कारभारात व निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढवण्याबरोबरच या महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकास, ग्रामीण भागातील समस्यांबद्दल संवेदनशीलना वाढवण्याच्या उद्देशाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा आदर म्हणून त्यांच्या नावाने ही योजना सुरू करत असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले. सरकारी यंत्रणेसोबत अशासकीय संस्थाचे सहकार्य घेतले जाईल. राज्य स्तरावर 50 मुख्य प्रशिक्षक, जिल्हा स्तरावर 50 प्रशिक्षक आणि 200 मार्गदर्शक हे बीट पातळीवर 25 हजार महिला प्रतिनिधींना प्रशिक्षण देतील. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. डिसेंबर अखेर संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईल. जानेवारी, 2010 नंतर निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींचा विचार या प्रकल्पासाठी करण्यात येईल. महिला प्रतिनिधींना बाहेर गावी राहण्याची समस्या येऊ नये म्हणून ही शिबिरे अनिवासी स्वरुपाची आहेत. केवळ व्याख्यानांच्या स्वरुपात प्रशिक्षण कंटाळवाणे होते हे ध्यानात घेऊन खेळ, गाणी, प्रात्यक्षिके अशी व्यवस्थापनातील नव्या प्रयोगांचा कल्पक वापर केला जाईल. आदिवासी महिलांना स्थानिक भाषेत प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.
प्रकल्प या जिल्ह्यांसाठी : ठाणे, नाशिक, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नांदेड, अमरावती, वर्धा
या संस्थांचा सहभाग : कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन व रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट
प्रशिक्षणासाठीचे विषय : पंचायत राज, ग्रामपंचायत कायदा, महिलांसाठीच्या योजना, ग्रामपंचायतीचे अर्थव्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास, अंधश्रद्धा, सामाजिक समस्या व उपाययोजना, महिलांच्या यशोगाथा.
28) “भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक कमी परंतु एकात्मिक अधिक आहे,” असे मत खालीलपैकी कोणी मांडले आहे ?
1) स्वा. वि. दा. सावरकर 2) नानी पालखीवाला
3) के. सी. व्हिअर 4) डी. डी. बसू
उत्तर : 3) के. सी. व्हिअर
स्पष्टीकरण :
के. सी. व्हीअर फेडरल सरकारची व्याख्या राज्यांची संघटना म्हणून करतात. जी विशिष्ट सामान्य हेतूंसाठी स्थापन केली गेली होती. परंतु ज्यात सदस्य देशांनी त्यांचे मूळ स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात ठेवले आहे. जेव्हा संघटनेचे सरकार अस्तित्त्वात असते तेव्हा काही घटकांच्या बाबतीत संपूर्ण क्षेत्रासाठी एकच स्वतंत्र अधिकार असते आणि त्यानुसार इतर प्राधिकरणाकरिता प्रत्येक प्रादेशिक अधिकारी स्वतंत्र प्रादेशिक अधिकारी असतात. त्याच्या स्वतःच्या क्षेत्रात इतरांशी समन्वय साधणे आणि अधीन करणे. अमेरिकेच्या फेडरल मतदार संघात येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील घटकांनी प्रयत्न केले. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया आणि भारतीय राज्यघटनेच्या कार्यात काही विशिष्ट वैशिष्ट्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे आपल्या राज्यघटनेत भारतीय परिस्थितीस अनुकूल काही कादंबरी तरतुदी आहेत. भारतीय संविधानाच्या संघटनेच्या स्वरूपाविषयी ज्या शंका उद्भवतात ती म्हणजे राज्यघटनेने केंद्र सरकारला दिलेल्या राज्यांच्या कार्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार व्हीरे यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षात भारतीय राज्य अर्ध-संघीय स्वरूपाचे आहे आणि काटेकोरपणे नाही. फेडरल. सर इव्होर जेनिंग्ज यांचे मत होते की, भारताचे एक मजबूत केंद्रीय धोरण आहे. डीडीबासूच्या शब्दात सांगायचं तर भारतीय राज्यघटना पूर्णपणे संघीय किंवा एकसंध नाही तर दोघांची जोड आहे. हे एक कादंबरी प्रकाराचे एक संघ किंवा संयुक्त आहे. भारतीय घटनेला केवळ अटींच्या कठोर अर्थाने फेडरल किंवा एकात्मक म्हणून मानले जात नाही. हे सहसा निसर्गाने अर्ध-फेडरल म्हणून देखील परिभाषित केले जाते. संपूर्ण राज्यघटनेच्या काळात, भारत एकच संयुक्त राष्ट्र आहे यावर जोर देण्यात आला आहे. भारताचे वर्णन स्टेटस युनियन म्हणून केले जाते आणि ते सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून बनलेले आहे.
29) खालीलपैकी कोणत्या समितीत फक्त कनिष्ठ गृहाच्या सदस्यांचाच समावेश असतो ?
1) आश्वासनसंबंधीची समिती 2) डेलिगेटेड लेजिस्लेशन समिती
3) सार्वजनिक उपक्रम समिती 4) अंदाज (एस्टिमेट्स) समिती
उत्तर : 4) अंदाज (एस्टिमेट्स) समिती
स्पष्टीकरण :
1921 मध्ये स्थापन झालेल्या स्थायी वित्तीय समितीमध्ये अंदाज समितीचा उगम आहे. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारसीनुसार 1950 मध्ये पहिली अंदाज समिती स्थापन केली गेली. सुरुवातीस या समितीची सदस्य संख्या 30 करण्यात आली. समितीचे सर्व सदस्य हे लोकसभेतुन निवडले जातात. लोकसभेचे सदस्य आपल्यामधुन एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधीत्व पद्धतीद्वारे या समितीवर निवडुन देतात. त्यामुळे सर्व पक्षांना योग्य प्रतिनिधीत्व मिळते. सदस्यांचा कार्यकाळ 1 वर्ष असतो. या समितीमध्ये मंत्री सदस्य होऊ शकत नाही. समितीच्या अध्यक्षाची निवड लोकसभेच्या सभापतीकडुन केली जाते. समितीचा अध्यक्ष निर्विवादपणे सत्ताधारी पक्षाचा असतो. या समितीचे मुख्य कार्य हे अर्थसंकल्पातील खर्चाच्या अंदाजाची तपासणी करुन कपात सुचविणे हे असते. म्हणुन या समितीला सतत कपात सुचविणारी समिती असे म्हणतात.
30) अर्थविषयक विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
1) राज्यसभा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त 14 दिवस विचाराधीन ठेवू शकते.
2) राज्यसभेने अर्थविषयक विधेयक दुरुस्तीसह 14 दिवसांच्या मुदतीत लोकसभेकडे सादर न केल्यास ते जसेच्या तसे दोन्ही सभागृहांनी संमत केले असे समजले जाते.
3) राज्यसभेने केलेल्या शिफारशी लोकसभा मान्य करते अथवा करत नाही.
4) राज्यसभेने केलेल्या शिफारशी लोकसभेला मान्य कराव्याच लागतात.
उत्तर : 4) राज्यसभेने केलेल्या शिफारशी लोकसभेला मान्य कराव्याच लागतात.
स्पष्टीकरण :
भारतीय संसदेचे तीन स्तंभ- लोकसभा,राज्यसभा आणि राष्ट्रपती. सामान्य जनांसाठी विधेयक मांडण्याचा अधिकार लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना आहे.मंत्रिपरिषदेतील सदस्यांनाही हा अधिकार आहे. मंत्र्यांनी आणलेल्या विधेयकाला शासकीय विधेयक म्हणतात, तर एका सदस्याने आणलेल्या विधेयकाला खाजगी सदस्य विधेयक म्हणतात. विधेयकाचे प्रथम वाचन, ही विधेयक संसदेपुढे आणण्याची पहिली पायरी. त्यासाठी प्रथम पीठासीन अधिकार्यांची मंजुरी घेणे आवश्यक आहे. पहिल्या वाचनात पीठासीन सभापती आपल्या अधिकारात चर्चा घडवून आणू शकतात. सदस्यांचा विरोध असल्यास पूर्ण खुल्या चर्चेलासुद्धा परवानगी देऊ शकतात. तसेच मतदानही घेऊ शकतात. यानंतर संसदेत हे विधेयक मांडले गेले, असे समजले जाते. विधेयक सभागृहात मांडले गेल्यानंतर ते राजपत्रात प्रकाशित केले जाते. काही प्रसंगी अध्यक्षांची परवानगी असेल तर सभागृहात मांडण्यापूर्वीही ते विधेयक राजपत्रात प्रकाशित करता येते. पीठासीन अधिकारी या विधेयकाचा मसुदा संबंधित विषय समित्यांकडे पाठवतात. विषय समिती सदस्य तज्ज्ञांचा व विषयाशी संबंधित अभ्यासकांचा सल्ला घेऊन आपला अहवाल तयार करतात. तो अहवाल सभेला सादर करतात. येथे पहिले परीक्षण व सामान्य वाचन संपते.दुसर्या वाचनातील प्रथम चरणात सैद्धांतिक पैलूंचा विचार केला जातो.आवश्यकता वाटल्यास विशेष/संयुक्त समित्यांकडे मसुदा पाठवला जातो.या समित्या खंडश: सर्व पैलूंचा विचार करतात. तज्ज्ञांचे, संबंधित संघटनांचे, राज्य सरकारांचे, केंद्रशासित प्रदेशांचेही मत घेतले जाऊ शकते.दुसर्या चरणात त्यांच्या अहवालाचा खंडश:विचार केला जातो. त्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्या मतदानासाठी ठेवल्या जातात. बहुमताने मंजूर झालेल्या या दुरुस्त्यांसह विधेयकाचे दुसरे वाचन सर्व खंड, पुरवण्या, इन्ऍक्टिंग फॉर्मुला लांबलेल्या शीर्षकासह पूर्ण होते. तिसर्या वाचनात विधेयक मांडणारा ते पारित करण्यासाठी पटलावर ठेवतो.या स्तरावर केवळ औपचारिक, मौखिक अथवा परिणामी दुरुस्त्याच चर्चेसाठी घेतल्या जातात. सविस्तर संदर्भ अपवादात्मक स्थितीतच चर्चेला येतात.सामान्य विधेयक पारित होण्यासाठी सदस्यांचे साधे बहुमत आणि त्यांनी केलेले मतदान पुरसे ठरते. परंतु,घटनादुरुस्ती असल्यास सभेच्या एकूण सदस्यसंख्येचे बहुमत असणे आणि त्या बहुमताच्या दोनतृतीयांश सदस्यांची अनुमती मतदानाद्वारे असणेे आवश्यक आहे. दुसर्या सभेचे विधेयक पारित करताना आधीच्या सभेतील परिचय स्तर सोडून इतर सर्व स्तर पुन्हा पार करणे सर्वस्वी सभेवर अवलंबून आहे. याला अर्थविषयक विधेयक मात्र अपवाद आहे. अर्थविषयक विधेयक केवळ लोकसभेत सादर होऊ शकते. लोकसभेत पारित झालेले विधेयक १४ दिवसांच्या आत राज्यसभेत पाठवावे लागते अन्यथा ते दोन्ही सभागृहाने पारित केले असे गृहीत धरले जाते. राज्यसभेतून आलेल्या शिफारशी स्वीकारण्याचे बंधन लोकसभेला नाही. मात्र, त्यांनी मानल्यास अर्थविषयक विधेयक त्या दुरुस्त्यांसह पारित केले जाते. आणि एवढे सगळे सोपस्कार संपल्यावर ते विधेयक राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीने कायद्यात रूपांतरित होते.
31) जोड्या लावा.
‘अ’ गट (ठिकाण) ‘ब’ गट (नेतृत्व)
अ) खानदेश I) भावे
ब) नलगुंडे II) भागुजी नाईक
क) अहमदनगर III) शंकर शाह
ड) सातपुडा IV) खर्जासिंग
अ ब क ड
1) IV I II III
2) III IV II I
3) III II IV I
4) IV III I II
उत्तर : 1) IV I II III
खानदेश – खर्जासिंग
नलगुंडे – भावे
अहमदनगर – भागुजी नाईक
सातपुडा – शंकर शाह
32) निरभ्र आकाशात उंचीवरून उडणार्या विमानाच्या मागे पांढरी तेजोरेषा (Trace) दिसण्यासाठी ………………
1) इंजिनापासून निघणार्या वाफेचे संघनन झाले पाहिजे.
2) सभोवतालच्या वातावरणातील हवा ही जास्त सापेक्ष आर्द्रता असलेली हवी.
3) सभोवतालच्या वातावरणातील हवा ही कमी सापेक्ष आर्द्रता असलेली हवी.
4) पर्याय 1 व 2
उत्तर : 4) पर्याय 1 व 2
स्पष्टीकरण :
इंजिनापासून निघणार्या वाफेचे संघनन झाले पाहिजे. सभोवतालच्या वातावरणातील हवा ही जास्त सापेक्ष आर्द्रता असलेली हवी.
33) भारतीय राष्ट्रवादाला ‘आध्यात्मिक आधार’ (Spiritual Base) कोणी दिला ?
1) अरविंद घोष 2) स्वामी रामानंद
3) स्वामी विवेकानंद 4) बंकिमचंद्र
उत्तर : 1) अरविंद घोष
स्पष्टीकरण :
अरविंद घोष हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ज्ञ, आणि महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात. ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले. ते लोकमान्य टिळकांचे सहकारी बनले. राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांनी मुंबईच्या ‘इंदुप्रकाश वृत्तपत्र’ या वर्तमानपत्रात लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. बंगालच्या 1905 मध्ये झालेल्या फाळणीनंतर ते हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे प्राचार्य झाले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्याच वर्षी त्यांनी मातरम् हे वृत्तपत्र सुरू केले. बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना, इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९०७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते.
34) ‘सोसायटी फॉर दी प्रोटेक्शन ऑफ हिंदू लिजन’ ही संस्था कोणी स्थापन केली ?
1) वि. दा. सावरकर आणि अनंत कान्हेरे 2) वासुदेव चाफेकर आणि दामोदर चाफेकर
3) अनंत कान्हेरे आणि बाळकृष्ण चाफेकर 4) दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर
उत्तर : 4) दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर
स्पष्टीकरण :
वासुदेव चापेकर यांनी दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणार्या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रॅंडला भारतात पाचारण केले. रॅंडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सार्यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली.
35) गर्जणारे चाळीस वारे यासंबंधी कोणते विधान बरोबर आहे ?
अ) वारे मोठ्या आवाजाने, जोरकसपणे व सातत्याने वाढतात.
ब) दक्षिण गोलार्धात वार्याची दिशा वायव्येकडुन पूर्वेकडे असते.
1) अ व ब चूक 2) फक्त ब
3) फक्त अ 4) यापैकी सर्व
उत्तर : 4) यापैकी सर्व
स्पष्टीकरण :
उत्तर व दक्षिण गोलार्धात 25 ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा आहे. येथून ध्रुव वृत्ताजवळ 60 ते 70 अंश उत्तर व दक्षिणेदरम्यान असणाऱ्या ध्रुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ांकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘प्रतिव्यापारी वारे’ असे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार आपल्या दिशेपासून विचलित होऊन साधारणपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, म्हणून यांना ‘पश्चिमी वारे’ असे म्हणतात.
प्रतिव्यापारी वाऱ्यांचे खालील दोन उपप्रकार आहेत.
उत्तर गोलार्धातील नर्ऋत्य प्रतिव्यापारी वारे – उत्तर गोलार्धात हे वारे नर्ऋत्येकडून ईशान्येकडे वाहत असल्याने त्यांना नर्ऋत्य प्रतिव्यापारी वारे असे म्हणतात.
दक्षिण गोलार्धात वायव्य प्रतिव्यापारी वारे – दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयकडे वाहत असल्याने यांना ‘वायव्य प्रतिव्यापारी वारे’ असे म्हणतात.
प्रतिव्यापारी वाऱ्यांची वैशिष्ट्ये प्रतिव्यापारी वाऱ्यांची दिशा व गती अनिश्चित असते. काही वेळेला हे वारे संथपणे वाहतात, तर काही वेळेस त्यांना उग्र वादळी स्वरूप प्राप्त होते. प्रतिव्यापारी वारे कर्क व मकर वृत्तातील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ध्रुव वृत्तावरील कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात. प्रतिव्यापारी वारे उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे वाहत असतात, त्यामुळे या वाऱ्यांची बाष्पधारण शक्ती कमी होते. उत्तर गोलार्धात प्रतिव्यापारी वाऱ्यांच्या दिशेवर आवर्त-प्रत्यावर्ताचा परिणाम होतो. हिवाळ्यात प्रतिव्यापारी वारे वेगाने वाहतात. दक्षिण गोलार्धात सागरी प्रदेश जास्त असल्याने प्रतिव्यापारी वारे नियमितपणे वाहतात. दक्षिण गोलार्धामध्ये 40 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे भूप्रदेशाचा अडथळा नसल्याने हे वारे वेगाने वाहतात. वाहताना ते विशिष्ट आवाज करत वाहतात, म्हणून त्यांना ‘गरजणारे चाळीस वारे’ असे म्हणतात. 50 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे संपूर्ण सागरी प्रदेश असल्याने या वाऱ्यांना कसलाच अडथळा नसतो. या भागात वाऱ्याचा वेग जास्त असतो आणि ते उग्र स्वरूप धारण करतात, म्हणून त्यांना ‘खवळलेले पन्नास वारे’ किंवा ‘शूर पश्चिमी वारे’ असे म्हणतात.
36) खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ?
अ) आसाममधील गुवाहाटी शहरातील प्रशासनाने ‘गॅगेटिक डॉल्फिनला’ शहर प्राण्याचा दर्जा दिला आहे.
ब) ‘गंगचे वाघ’ या टोपण नावाने या डॉल्फिनला ओळखले जाते.
1) अ बरोबर ब चूक 2) दोन्ही बरोबर
3) दोन्ही चूक 4) अ चूक ब बरोबर
उत्तर : 2) दोन्ही बरोबर
स्पष्टीकरण :
डॉल्फिन ही सस्तन माशाची प्रजाती आहे. डॉल्फिनला जलचरांतील बुद्धिमान प्राण्यांपैकी एक मानले जाते. डॉल्फिन हे साधारणपणे खोल समुद्रात असतात. पण गंगा नदीतही या प्रकारच्या माशांची एक प्रजाती आढळते. भारतातील गंगा नदीच्या पात्रात आढळणारा हा प्राणी भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे.
37) भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत किती महिलांना प्रदान करण्यात आला ?
1) चार महिलांना 2) पाच महिलांना
3) दोन महिलांना 4) तीन महिलांना
उत्तर : 2) पाच महिलांना
स्पष्टीकरण :
भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. 1954 मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला 2 जानेवारी 1954 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. 1955 साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्न’ देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर 12 हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्न दिले गेले आहे. 2014 मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. 2015 सालापर्यंत 41 जणांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात नमूद केले आहेत. 2 फेब्रुवारी 1954 साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला.
38) 5 ऑगस्ट, 2016 रोजी ‘रिओ ऑलिंपिक स्पर्धा 2016’ चे उद्घाटन झाले. या स्पर्धेचे घोषवाक्य काय होते ?
1)World Peace and Environment
2) World is full of spirit
3) Game and Spirit
4) Global Sport and Life
उत्तर : 1) World Peace and Environment
स्पष्टीकरण :
2016 उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची 31वी आवृत्ती दक्षिण अमेरिकेच्या ब्राझिल देशामधील रियो दि जानेरो ह्या शहरामध्ये ऑगस्ट 2016 मध्ये खेळवण्यात येईल. 2 ऑक्टोबर 2009 रोजी डेन्मार्कच्या कोपनहेगन शहरात झालेल्या आय.ओ.सी.च्या 121व्या अधिवेशनादरम्यान रियोची यजमान शहरपदी निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी शिकागो, टोकियो व माद्रिद ही इतर शहरे देखील यजमानपदाच्या घोडदौडीत होती. परंतु सर्वाधिक मते मिळवून ह्या स्पर्धा पटकावणारे रियो हे दक्षिण अमेरिकेमधील पहिले शहर ठरले.
39) सन 1853 मध्ये रेल्वेची सुरुवात झाली. 1905 पर्यंत भारतात सुमारे 40000 मैल लोहमार्ग अस्तित्वात होते. “रेल्वेमधील गुंतवणूक म्हजणे दुसर्याच्या पत्नीला दागिन्यांनी सजविणे.” असे रेल्वेविषयी मार्मिक उद्गार कोणी काढले ?
1) न्या. रानडे 2) लोकमान्य टिळक
3) गो. ग. आगरकर 4) महात्मा गांधीजी
उत्तर : 2) लोकमान्य टिळक
स्पष्टीकरण :
बाळ गंगाधर टिळक (जुलै 23,इ.स. 1856 – ऑगस्ट 1, इ.स. 1920) हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक होते. ‘लोकमान्य’ या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. तत्कालीन भारतीय नेतृत्त्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करुन वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले.
40) पुढील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी 56.6 % क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो.
ब) पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ येथे लागवडीखालील क्षेत्र कमी आहे.
क) कोकण तसेच पूर्व विदर्भ येथे 70% क्षेत्र लागवडीखाली आहे.
1) फक्त अ 2) फक्त ब
3) अ व क 4) वरील सर्व
उत्तर : 1) फक्त अ
स्पष्टीकरण :
लागवडीयोग्य म्हणजे ज्या भूमीवर शेती करता येते किंवा भूमी कृषी योग्य आहे अशा सर्व भूमीस लागवडी योग्य भूमी असे म्हणतात. यात निवड पिकाखालील क्षेत्र पडीक क्षेत्र व शेतीखालील नसलेली जमीन पडीत जमीन वगळून इत्यादींचा समावेश होतो. महाराष्ट्राला लाभलेल्या भूमी पैकी 56% क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. यालाच लागवडीखालील क्षेत्र म्हणतात. प्राकृतिक रचना हवामान मृदा जलसिंचन सुविधा उताराचे स्वरूप यांचा परिणाम लागवडी खालील क्षेत्रावर होतो. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ येथील 70% क्षेत्र लागवडीखाली आहे. कोकण तसेच पूर्व विदर्भामध्ये जमिनीचे क्षेत्र तीव्र उतार व वनांची आच्छादनामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी आहे. वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण यामुळे जमिनीचा वापर घरांसाठी वस्त्यांसाठी होत असल्याने शहरी भागात जवळील लागवडीखालील क्षेत्रामध्ये वेगाने घट होत आहे. शेतीखाली नसलेली जमीन पडीत जमीन वरुण वगळून राज्यात जवळपास 24 लाख हेक्टर म्हणजे राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या 7.9% इतकी आहे. यात कायम कुरण आणि चराऊ जमीन वृक्षांच्या बागा व मळे कृषी योग्य ओसाड जमीन इत्यादींचा समावेश होतो. या जमिनीचा वापर जरी पीक उत्पादनासाठी केला जात नसला तरी आपणास या जमिनीवर पिक उत्पादन घेता येते. तसेच लागवडीयोग्य जमिनीत पडीक जमिनीचाही समावेश होतो.
41) पुढील कोणते विधान अयोग्य आहे ?
1) महाराष्ट्रातील 22.5 टक्के क्षेत्र कालव्याने जलसिंचित होते.
2) महाराष्ट्रातील सुमारे 8 टक्के क्षेत्र उपसा जलसिंचनाद्वारे ओलिताखाली आणलेले आहे.
3) महाराष्ट्रातील एकूण जलसिंचनापैकी विहीर जलसिंचनाद्वारे हिस्सा 19% इतका आहे.
4) महाराष्ट्रातील सुमारे 14.5% क्षेत्र तलावाद्वारे जलसिंचन होते.
उत्तर : 3) महाराष्ट्रातील एकूण जलसिंचनापैकी विहीर जलसिंचनाद्वारे हिस्सा 19% इतका आहे.
स्पष्टीकरण :
विहीर जलसिंचन महाराष्ट्र्रात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या 1995 च्या आकडेवारीनुसार 11 लाख 43 हजार विहिरी आहेत. यापैकी सुमारे 10 लाख विहिरींवर ऑईल इंजिन किंवा विद्युत पंप बसविलेले आहेत. विहिरींमधून 2,54,710 हेक्टर मीटर पाणी उपसा करण्यासाठी उपलब्ध होते आणि दरवर्षी पावसाचे जे पाणी भूगर्भात मुरते त्याचा विचार करता 321810 हेक्टर पाणी वापरासाठी मिळू शकते. महाराष्ट्र्रातील भूमिगत पाण्याच्या एकूण साठयाचा अंदाज पाहता आणखी 11 लाख 82 हजार विहिरी खोदता येतील. तलाव जलसिंचन महाराष्ट्र्रात तलाव जलसिंचनाचे प्रमाण 15 टक्के आहे. महाराष्ट्र्रात प्रामुख्याने विदर्भामध्ये भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात तलावाच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. या प्रदेशात तलावाद्वारा होणार्या जलसिंचनाचे प्रमाण सुमारे 60 टक्के आहे. पाझर तलाव महाराष्ट्र्रामध्ये तलावांच्या साहाय्याने देखील काही प्रमाणात जलसिंचनास फायदा होतो. याचा मुख्य उपयोग प्रदेशामधील भूजल साठा वाढविणे आणि विहिरीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी होतो. महाराष्ट्र्रात 1972 साली अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा पाझर तलावांची योजना अमलात आणली गेली. यामुळेच अवर्षणग्रस्त प्रदेशात हळूहळू जलसिंचनाचे क्षेत्र वाढू लागले. सध्या महाराष्ट्र्रात पाझर तलावांची संख्या सुमारे 1400 आहे, तर 1800 पाझर तलावांची कामे चालू आहेत. भविष्य काळात आणखी 3000 पाझर तलाव तयार होतील. उपसा जलसिंचन विहिरी किंवा नदीच्या पात्रातून अथवा जलाशयातून उंच भागातल्या जमिनीला पाणीपुरवठयाची सोय उपलब्ध करुन द्यावयाची असेल तर हे पाणी उंचावर न्यावे लागते. यासाठी ऑईल इंजिन्स व विजेचे पंप यांचा वापर केला जातो. महाराष्ट्र्रात एकूण जलसिंचन क्षेत्रांपैकी 8 टक्के क्षेत्र हे उपसा जलसिंचनाचे आहे. महाराष्ट्र्रात मुख्यत्वेकरुन दक्षिण महाराष्ट्र्रात विशेषत: कोल्हापूर जिल्हा आणि कोकणामध्ये रत्नागिरी व संधिुदुर्ग जिल्हयात उपसा जलसिंचनाद्वारे जमिनीला पाणीपुरवठा केला जातो.
42) पुढील कोणते विधान योग्य आहे ?
अ) सह्याद्री पर्वत, महादेव, हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगर रांगांच्या प्रदेशात चढ – उतारांच्या टेकड्यांमुळे रस्त्यांचा विकास कमी झालेला आहे.
ब) पूर्वेकडील डाट वनांच्या गडचिरोली जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे कमी प्रमाणात आढळते.
1) केवळ अ 2) केवळ ब
3) अ व ब दोन्ही योग्य 4) ‘अ’ व ‘ब’ दोन्ही योग्य नाहीत.
उत्तर : 3) अ व ब दोन्ही योग्य
स्पष्टीकरण :
सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याशेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे. ही अंदाजे 1600 किलोमीटर लांबीची डोंगररांग ताप नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते व महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते. या डोंगररांगेचा जवळजवळ 60% भाग हा कर्नाटकात येतो. या डोंगररांगेचे क्षेत्रफळ 60,000 चौरस कि.मी. असून या रांगेची सरासरी उंची 1200 मीटर आहे. अनेक उंच शिखरे ही डोंगररांग सामावून घेते, त्यामध्ये डोंगररांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसूबाई शिखर (उंची 1646 मी), साल्हेर (1567 मी), महाबळेश्वर(उंची 1438 मी) आणि हरिश्चंद्रगड(उंची 1424 मी), कर्नाटकात 1862 मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर (उंची 2695 मी). अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. या डोंगररांगेत महत्त्वाचा खंडभाग पालघाट खिंडीच्या स्वरूपात आहे हा तमिळनाडू आणि केरळ यांना जोडतो. इथे सह्याद्रीची सर्वात कमी उंची आहे (300 मी).
43) पुढीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने योग्य आहेत ?
अ) ब्रिटनमधील हुजूर पक्षाच्या थेरेसा मे यांची 13 जुलै, 2016 रोजी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली.
ब) थेरेसा मे या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत.
क) ब्रिटनच्या राणी एलिझाबेज द्वितीय यांनी नेमलेल्या त्या 13 व्या पंतप्रधान ठरल्या आहेत.
1) फक्त ‘अ’ 2) फक्त ‘ब’
3) फक्त ‘अ’ आणि ‘ब’ 4) फक्त ‘अ’ आणि ‘क’
उत्तर : 4) फक्त ‘अ’ आणि ‘क’
स्पष्टीकरण :
थेरेसा मेरी मे ही युनायटेड किंग्डम देशातील एक राजकारणी, देशाची माजी पंतप्रधान व हुजूर पक्षाची पक्षाध्यक्ष आहे. 13 जुलै 2016 रोजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन ह्याने पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानपदी मेची निवड करण्यात आली. मार्गारेट थॅचर नंतरची ती ब्रिटनची दुसरीच महिला पंतप्रधान आहे. मे च्या नेतृत्त्वाखाली ब्रेक्झिटचे अनेक प्रस्ताव नामंजूर झाल्यावर त्यांनी 24 मे, 2019 रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
44) पुढीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?
अ) आयफोम या सेंद्रिय शेती क्षेत्रातील जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संघटनेने प्रसिद्ध केलेल्या 2014 सालच्या माहितीनुसार जगात सर्वाधिक सेंद्रिय उत्पादक शेतकर्यांची संख्या भारतामध्ये आहे.
ब) अमेरिका व चीन जगात अनुक्रमे दुसर्या व तिसर्या क्रमांकावर आहेत.
क) सर्वाधिक सेंद्रिय क्षेत्र असलेला देश ऑस्ट्रेलिया आहे.
1) फक्त ‘अ’ योग्य 2) फक्त ‘ब’ योग्य
3) ‘अ’ व ‘ब’ योग्य 4) ‘अ’ व ‘क’ योग्य
उत्तर : 4) ‘अ’ व ‘क’ योग्य
स्पष्टीकरण :
शेतीतील नविन पिढी जी रासायनिक शेती पध्दतीवर जास्त अवलंबून आहे, अशा जगभरातील युवा व्यावसायीकांना सेंद्रीय शेती पध्दतीचे शिक्षण देण्यासाठी डब्लू.डब्लू.ओ.ओ.टफ इंडिया (wwoof-India) त्यांना भारतातील सेंद्रीय शेतीच्या संपर्कात आणण्याचे कार्य करीत आहे. पुर्वी राबवित असलेल्या अनेक उपक्रमांतून ते शोतकरयाना सेंद्रीय शेती पध्दती शिकविण्यासोबतच जगभरातील विद्यार्थ्यांना जे सेंद्रीय शेती पध्दती शिकू इच्छितात त्यांना अशा शेतांवर प्रत्यक्ष काम करण्याची व त्याद्वारे विविध देशांतील सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्याची संधी उपलब्ध करून देते. आज शेतीत वापरल्या जाणारया विविध कृषी रसायनांमुळे पर्यावरणाला होणारी हानी तसेच आरोग्यावर होणा-या दुषपरिणामांमुळे खाद्यान्नाच्या गुणवत्तेविषयी ग्राहक जागरूक होत आहे. जागतिक पातळीवर ग्राहक हा सेंद्रीय उत्पादनांना सुरक्षित व दुष्परिणाम विरहीत समजत आहे. विकसित व विकसनशील देशांमध्ये सेंद्रिय उत्पादनांनी मागणी दिवसेंदिवस अंदाजे 20-25 टक्के प्रती वर्ष या दराने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा फायदा संयोजाकांसोबत शेतात सेंद्रिय शेती शिकताना स्वयंसेवक भारताला सेंद्रीय शेतीत भरपुर संधी उपलब्ध आहेत. सेंद्रीय शेती ही पुर्वीपासूनच भारतीय शेतीचा एक अविभाज्य अंग आहे. भारत हा सेंद्रीय शेतीसाठी आवश्यक असलेल्या अनेक बाबी जसे पशुधन, विविध कृषि हवामान आधारित जैवविविधता हयांनी समृध्द्र आहे तसेच मोठ्या प्रमाणात लहान व सिमांत शेतकरी आहेत. त्यामुळेच सेद्रिय शेती ही संस्कृतीच आहे देशाच्या अनेक भागात जसे पर्वतीय व कोरडवाहू शेतीत अतिशय कमी प्रमाणात कृषी निविष्ठांचा वापर करण्याच्या पध्दतीमुळे शेतक-यांना सेंद्रीय शेतीकडे वळणे सोपे होऊन, सतत वाढत असलेल्या देशीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा फायदा घेण्याची मोठी संधी उपलब्ध आहे व त्यामुळे रासायनिक शेतीवर अवलंबून असलेल्या नविन पिढीला सेंट्रीय शेतीचे शिक्षण देणे ही आता काळाची गरज आहे .
45) खालील विधाने लक्षात घ्या.
अ) संशोधनाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचा 2015 सालासाठीचा जी. डी. बिर्ला पुरस्कार संजय मित्तल यांना प्रदान करण्यात आला.
ब) घनश्याम दास बिर्ला यांच्या सन्मानार्थ के.के. बिर्ला फाउंडेशनने वर्ष 1991 पासून हा पुरस्कार देण्यात सुरुवात केली.
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
1) फक्त ‘अ’ 2) फक्त ‘ब’
3) ‘अ’ व ‘ब’ 4) यापैकी नाही.
उत्तर : 3) ‘अ’ व ‘ब’
स्पष्टीकरण :
जी. डी. बिर्ला पुरस्कार हा एक लाख रुपये रोख रकमेचा समावेश असलेला हा पुरस्कार पन्नास वर्षे वयापेक्षा कमी वय असलेल्या शास्त्रज्ञयानि शास्त्रीय संशोधनात बजाविलेल्या विशेष कामगिरीबद्दल के. के. बिर्ला फाऊडेशनच्या वतीने दिला जातो.
46) बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ) या योजनेंतर्गत रस्ते अपघातातील जखमींवर पहिले 3 दिवस मोफत उपचार करण्यात येतील.
ब) ‘महात्मा फुले जन आरोग्य’ योजनेसाठी जे निकष आहेत तेच या योजनेसाठी लागू राहतील.
क) या योजनेतील खर्चाची मर्यादा 30 हजार एवढी आहे.
1) फक्त ‘अ’ 2) फक्त ‘ब’
3) वरील सर्व 4) फक्त ‘क’
उत्तर : 3) वरील सर्व
स्पष्टीकरण :
महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर कोणालाही अपघात झाल्यास बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेअंतर्गत 72 तास मोफत औषधोपचार किंवा 30 हजार रुपये देण्याची घोषणा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केली होती.
47) पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) स्टेनलेस स्टील हे लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल यांचे संमिश्र आहे.
ब) कार्बनमुळे काठिण्य प्राप्त होते.
क) क्रोमिअम आणि निकेलमुळे संमिश्रास चकाकी प्राप्त होते.
1) फक्त ‘अ’ 2) फक्त ‘ब’
3) फक्त ‘क’ 4) वरील सर्व योग्य
उत्तर : 4) वरील सर्व योग्य
स्पष्टीकरण :
स्टेनलेस स्टील हे लोखंड, कर्ब, मॅंगेनीझ, फॉस्फरस, स्फुरद, सिलिकॉन, प्राणवायू, नत्रवायू, ॲल्युमिनियम तसेच 10.5% ते 11% क्रोमियम असलेले मिश्रधातू आहे. हा मिश्रधातू साध्या लोखंडापेक्षा गुणाने वाढतो. मुख्य म्हणजे अजिबात गंजत नाही.तर कठीणपणाही वाढतो.रंग चकचकीत पांढरा.नेहमी स्वच्छ दिसतो.हवेचा परिणाम होत नाही. कारखान्यात भरपुर उपयुक्त तर घरगुती वापर लोकप्रिय. सहसा ‘स्टिल’ अशाच नावाने प्रसिध्द.
48)
अ) मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशींची संख्या 10,000 दशलक्ष असते.
ब) प्रौढ माणसाच्या शरीरात 60 – 90 दशलक्ष पेशी असतात.
क) मानवी शरीरातील सर्व पेशी टोकाला टोक लावून जोडल्यास पृथ्वीभोवती साडेचार फेर्या होऊ शकतील.
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
1) फक्त ‘अ’ 2) वरील तिन्हीही
3) फक्त ‘अ’ 4) फक्त ‘क’
उत्तर : 2) वरील तिन्हीही
स्पष्टीकरण :
हा प्राण्यांच्या शरीरातील एक गुंतागुंतीचा अवयव आहे. हा अवयव डोक्यामध्ये कवटीच्या आत असतो.
शरीरातील सर्व ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया मेंदूकडून नियंत्रित केल्या जातात. मेंदूमध्ये सुमारे 100 अब्ज चेतापेशी असतात. मानवी मेंदूची डावी बाजू शरीराची उजवी बाजू नियंत्रित करते.
मेंदूची क्षमता असते अंदाजे 2.5 पेटाबाईट.
1 पेटाबाईट म्हणजे 1000 टेराबाईट.
1 टेरा बाईट 1000 जीबी.
म्हणजे 16 जीबीची मेमरी असलेले 1 लाख 56 हजार फोन!! मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेंकदात 38 हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे, सपष्ट होते, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे. मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या एकापुढे एक पसरविल्या, तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या किंवा पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालण्याइतक्या लांबीच्या होतील. आपल्या मेंदूमध्ये 10000 कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात. आकाशगंगेत असणाऱ्या ताऱ्यांएवढी ही संख्या असते. दर सेकंदाला एक न्यूरॉन याप्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो, तर आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला 3171 वर्षे लागतील! एका मेंदूतले सगळे न्यूरॉन्स एकापुढे एक मांडले तर त्याची लांबी साधारणपणे 1000 कि.मी. एवढी होईल. पण न्यूरॉन्सची रुंदी फक्त 10 मायक्रॉन असल्यामुले ते आपल्याला दिसणारच नाहीत.
49) खालील प्रश्नाच्या सुरुवातील Y या नावाने एक मुख्य आकृती दिलेली आहे. त्याखाली 1, 2, 3, 4 अशा 4 पर्यायी आकृत्या दिलेल्या आहेत. Y आकृतीतील चौकोन पूर्ण करण्याकरिता पर्यायातील कोणती आकृती तंतोतंत बसेल ?
उत्तर : 1)
स्पष्टीकरण :
Y आकृतीतील चौकोन पूर्ण करण्याकरिता पर्याय 1 मधील आकृती तंतोतंत बसेल. कारण, या आकृतीमध्ये एक टोक चौरस दिसते तर दुसरे थोडे निमुळते.
50) खालील प्रश्नांमध्ये सुरूवातीस एक घडी न घातलेला कागद दिलेला आहे. त्यावर विशिष्ट नक्षी काढलेली आहे. त्या कागदाला आकृतीत दाखविल्याप्रमाणे बिंदु रेषेवर घडी घातल्यास तो कसा दिसेल ते पर्यायातून शोधा.
(1) (2) (3) (4)
उत्तर : 4)
स्पष्टीकरण :
कागदाला आकृतीत दाखविल्याप्रमाणे बिंदु रेषेवर घडी घातल्यास तो पर्याय 4 प्रमाणे दिसेल. कारण, वरचा त्रिकोण हा जेव्हा खालच्या त्रिकोणावर येईल तेव्हा दोन्ही त्रिकोण एकसमान होतील. त्याचप्रमाणे जेव्हा वरचा अर्धवर्तुळ खाली येईल तेव्हा दोन्ही मिळुन पुर्ण वर्तुळ तयार होईल.
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download